Ajit Pawar : काँग्रेस, राष्ट्रवादी पवार गटाचे पराभूत आमदार अजित पवार यांच्या संपर्कात; अजितदादा मात्र 'वेट अँड वॉच'च्या भूमिकेत!

पुणे : विधानसभा निवडणुकीत (Assembly Election) पराभूत झालेले पुण्यातील काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील (SP Group) दोन माजी आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादीत योग्य पुनर्वसन झाल्यास हे माजी आमदार पक्षप्रवेश करण्यास तयार असल्याचे समजते. मात्र, त्यांना पक्षात प्रवेश दिल्यास पक्षातील निष्ठावंतांवर अन्याय होण्याची भीती असल्याने या माजी आमदारांबाबत अजित पवार काय भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा दारुण पराभव झाला. काँग्रेसच्या तीनही विद्यमान आमदारांचा पराभव झाला, तर पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा केवळ एकच उमेदवार निवडून आला आहे. याउलट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ आमदार निवडून आले आहेत. त्यातच राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता असल्याने आगामी काळात पुणे जिल्ह्यावर अजित पवारांचे वर्चस्व राहणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातील पराभूत आमदारांनी आगामी राजकारणाची दिशा पाहून अजित पवार यांच्याशी जुळवून घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.


पुणे जिल्ह्यातील या दोन्ही पक्षांतील प्रत्येकी एका माजी आमदाराचा समावेश आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या दोन्ही माजी आमदारांनी राष्ट्रवादीत येण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, आपले पक्षात योग्य पुनर्वसन व्हावे, अशी या माजी आमदारांची मागणी आहे. त्यासाठी पवारांशी संपर्कही साधला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,

नेरळ–माथेरान मिनी ट्रेन’ पुन्हा रुळावर!

पर्यटकांसाठी ऐतिहासिक रेल्वे सेवा १ नोव्हेंबरपासून रायगड : महाराष्ट्रातील प्रसिद्ध