Avinash Jadhav : अविनाश जाधव यांचा तडकाफडकी राजीनामा का? मनसेच्या नेत्याने सांगितलं हे कारण

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि मनसे (MNS) ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी (Avinash Jadhav Resign) राजीनामा दिला आहे. अविनाश जाधव यांच्या राजीनाम्यामुळे मनसेला खिंडार पडण्याची शक्यता आहे. अविनाश जाधव यांनी अचानक राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. अविनाश जाधव यांनी पराभवाची जबाबदारी घेत ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.


मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे ठाणे आणि पालघरचे जिल्हाध्यक्ष पद आहे. अविनाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे आणि पालघर जिल्ह्यात उमेदवारांनी निवडणूका लढविल्या होत्या. ठाणे शहर मतदारसंघातून अविनाश जाधव यांनी सुद्धा निवडणूक लढविली होती. परंतु या मतदारसंघातून भाजपचे उमेदवार संजय केळकर यांनी पराभव केला होता. अविनाश जाधव हे या मतदारसंघात तिसऱ्या क्रमांकावर होते. मनसेच्या ठाणे जिल्ह्यातील इतर उमेदवारांचाही पराभव झाला होता. अखेर अविनाश जाधव यांनी ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष पदावरून राजिनामा दिला आहे. राजिनाम्याचे पत्र त्यांनी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी मनसेचे नेते राज ठाकरेंचे निकटवर्तीय संदीप देशपांडे यांनी याविषयी प्रतिक्रिया दिली आहे.



अविनाश जाधव यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवत आपला जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाची जबाबदारी स्विकारत त्यांनी आपला राजीनामा दिला आहे. माझ्याकडून काम करताना कळत नकळत काही चूक झाली असल्यास मला माफ करावं, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. मात्र आता राज ठाकरे त्यांचा हा राजीनामा स्विकारतात का हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.





हे आहे खरं कारण?


संदिप देशपांडे म्हणाले, अविनाश जाधव हे भावनिक झाले आहेत. सध्या आम्ही त्यांच्याशी बोलू, चर्चा करू.. याविषयी राज ठाकरे योग्य तो निर्णय घेतील. भावनिक होऊन त्यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला आहे. या संदर्भात लवकरच चर्चा करण्यात येईल. अविनाश जाधव यांचा राजीनामा पक्षाने अद्याप स्विकारलेला नाही.पक्षांतर्गत बऱ्याच गोष्टी घडतात ते सध्या भावनिक झाले आहे. अविनाशने पक्षासाठी बरच काही केले आहे. लवकरच आम्ही अविनाशसोबत बोलणार आहोत.

Comments
Add Comment

२६ जानेवारीपासून पश्चिम रेल्वेवर एसी लोकल सेवांचा विस्तार; दररोजसाठी वाढणार इतक्या फेऱ्या

मुंबई : पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. २६ जानेवारी २०२६ पासून पश्चिम

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल — उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न विविध विद्याशाखांतील १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या

मनपा निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर २४ तासांच्या आत मंत्रिमंडळाची बैठक, झाले महत्त्वाचे निर्णय

मुंबई : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांचा निकाल शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर झाला. या निकालानुसार

44-Hour Water Block : मुंबईतील धारावीसह पूर्व आणि पश्चिम उपनगर येत्या मंगळवारपासून ४४ तासांचा पाणी ब्लॉक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई : महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्‍या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या

Nitesh Rane : 'हा' तर मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचा करिश्मा!"- महायुतीच्या विजयानंतर नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) महायुतीने मिळवलेल्या

पुण्यात शिवसेना शून्यावर बाद !

मुंबई : पुणे महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये केवळ १५ जागा भाजपने शिंदेसेनेला दिल्या होत्या.