Pollution : विषय गंभीर; मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली!

महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचा पुढाकार; रेडी मिक्स कंक्रीट प्लांटची स्थापना


मुंबई : मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता (Pollution) खालावत असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (Maharashtra Pollution Control Board) यावर चिंता व्यक्त केली आहे. हवेची गुणवत्ता अधिक खालावत असल्याने महानगर क्षेत्रातील महापालिकेच्या हद्दीत नवीन रेडी-मिक्स काँक्रीट प्लांट उभारण्यास यापुढे परवानगी दिली जाणार नसून सुरू असलेल्या प्लांट्सना पुढील तीन महिन्यांत प्रवेश आणि निर्गमन गेट्सवर धूळ प्रतिबंधक पडदे लावणे, तसेच वाहनांच्या टायरांवर पाणी फवारणी करणे बंधनकारक असणार आहे. या नवीन नियमांचे पालन न केल्यास बँक गॅरंटी जप्त करणे किंवा प्लांट बंद करणे यासारख्या कडक कारवाईचा सामना करणार असल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश रामदास कदम यांनी सांगितले.


महानगर क्षेत्राबाहेर, महापालिका हद्दीत नसलेल्या भागात बांधकामाजवळ उभारल्या जाणाऱ्या नवीन कॅप्टिव्ह आरएमसी प्लांटला एकूण मिळालेल्या जमिनीच्या १० टक्के भागावर उभारणे आवश्यक असणार आहे. तसेच ते संपूर्णतः सर्व बाजूंनी टिन किंवा तत्सम सामग्रीच्या बंदिस्त रचनेत असावे. यासाठी बँक गॅरंटी म्हणून १० लाख रुपये जमा करून पुढील तीन महिन्यांत हे नियम पूर्ण करावे लागतील.



एमपीसीबीच्या अधिसूचनेत म्हटले आहे की, बांधकामाचे ७० टक्के काम पूर्ण झाल्यावर किंवा ताबा घेतल्यानंतर प्लांट एका महिन्यात हलवावा किंवा तोडून टाकावा लागणार आहे. मुंबई शहरातील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत असून एक्युआय हा ११८ वर पोहोचलाय. मुंबईची हवेची गुणवत्ता हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर बिघडते. ‘वर्ल्ड एअर क्वालिटी रिपोर्ट २०२३’ च्या नुसार, जानेवारी २०२३ मध्ये मुंबईतील पीएम २.५ पातळीमध्ये २०२२ च्या तुलनेत २३ टक्के इतकी वाढ झाली होती. यामुळे मुंबई हिवाळ्यात जगातील सर्वाधिक प्रभावित शहरांपैकी एक ठरली. यावर प्रशासनाने योग्य पावलं ऊचलणं बंधनकारक आहे. नोव्हेंबर महिन्यातील २८ तारखेला मुंबईमधील गेल्या आठ वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. मुंबईमधील नीचांकी तापमान हे १६.८ अंश इतक होत याची नोंद हवामान खात्याकडून करण्यात आली. अशा प्रकारचं थंडीच वातावरण पुढील काही दिवस असणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला होता. या परिस्थितीनंतर मुंबईची हवेची गुणवत्ता (Pollution) सुधारण्यासाठी प्रादेशिक एअरशेड धोरणाची गरज असल्याचे अभ्यासकांनी आपलं मत मांडलं होतं.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)