Soap Price Hike : आता अंघोळ करणेही महागणार! कंपन्यांनी वाढवले 'या' साबणांचे दर

मुंबई : देशभरात सातत्याने महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. सोन-चांदी, भाजीपाला, खाद्य तेल, फळे, पेट्रोल-डिझेल अशा दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच आता ही महागाई बाथरूमकडेही वळली आहे. साबण बनवणाऱ्या कंपन्यांनी साबणाच्या किमतीत (Soap Price Hike) वाढ केली आहे. त्यामुळे आता अंघोळ करणेही महाग होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशिया आणि मलेशियामधून आयात केले जाणाऱ्या शुल्कात वाढ ३५-४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या पामतेलाचा भाव सुमारे १,३७० रुपये प्रति १० किलो आहे. त्यामुळे देशातील दैनंदिन ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG) कंपन्यांनी अंघोळीच्या साबणाच्या किमतीत ८ टक्क्यांनी वाढ केली आहे.



कोणत्या साबणाचे वाढले दर?


डव्ह, लक्स, लाईफबॉय, Liril, Pierce, Rexona या ब्रँड्सच्या किमती वाढवल्या आहेत. दरम्यान, FMCG क्षेत्रात सहसा एक कंपनी आधी किमती वाढवते, त्यानंतर हळूहळू इतर कंपन्याही किमती वाढवतात. त्याच धर्तीवर एचयूएल आणि विप्रोनंतर इतर कंपन्याही साबणाच्या किमती लवकरच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Soap Price Hike)

Comments
Add Comment

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज

‘निष्क्रिय स्वेच्छामृत्यू’ प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखीव

१३ वर्षांपासून ब्रेन डेड अवस्थेत असलेल्या हरीश राणाच्या पालकांच्या अर्जावर सुनावणी नवी दिल्ली : गेल्या १३

अर्थसंकल्पापूर्वी का साजरी केली जाते ‘हलवा सेरेमनी’?

नवी दिल्ली : देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ सादर होण्यासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. १ फेब्रुवारी रोजी

मायावतींचा उत्तर प्रदेशात स्वबळाचा नारा

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी गुरुवारी त्यांचा ७० वा वाढदिवस साजरा केला.

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे