Soap Price Hike : आता अंघोळ करणेही महागणार! कंपन्यांनी वाढवले 'या' साबणांचे दर

मुंबई : देशभरात सातत्याने महागाईचा भडका उडताना दिसून येत आहे. सोन-चांदी, भाजीपाला, खाद्य तेल, फळे, पेट्रोल-डिझेल अशा दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंचे दर वाढत चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. अशातच आता ही महागाई बाथरूमकडेही वळली आहे. साबण बनवणाऱ्या कंपन्यांनी साबणाच्या किमतीत (Soap Price Hike) वाढ केली आहे. त्यामुळे आता अंघोळ करणेही महाग होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशिया आणि मलेशियामधून आयात केले जाणाऱ्या शुल्कात वाढ ३५-४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या पामतेलाचा भाव सुमारे १,३७० रुपये प्रति १० किलो आहे. त्यामुळे देशातील दैनंदिन ग्राहकोपयोगी वस्तू (FMCG) कंपन्यांनी अंघोळीच्या साबणाच्या किमतीत ८ टक्क्यांनी वाढ केली आहे.



कोणत्या साबणाचे वाढले दर?


डव्ह, लक्स, लाईफबॉय, Liril, Pierce, Rexona या ब्रँड्सच्या किमती वाढवल्या आहेत. दरम्यान, FMCG क्षेत्रात सहसा एक कंपनी आधी किमती वाढवते, त्यानंतर हळूहळू इतर कंपन्याही किमती वाढवतात. त्याच धर्तीवर एचयूएल आणि विप्रोनंतर इतर कंपन्याही साबणाच्या किमती लवकरच वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Soap Price Hike)

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे