Champions Trophy प्रकरणात ICCसमोर आहेत हे ३ पर्याय

  40

मुंबई: भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्यातील संघर्षामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी(Champions Trophy) स्पर्धेबाबत साशंकता आहे. एकीकडे बीसीसीआय आपल्या संघाला पाकिस्तानात पाठवण्यास तयार नाही आहे तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही स्पष्ट केले आहे की त्यांना संपूर्ण स्पर्धेचे आयोदन पाकिस्तानात करायचे आहे. याशिवाय पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यास तयार नाही. यातच २९ नोव्हेंबरला आज आयसीसीने बैठक बोलावली आहे.


ही व्हर्चुअल मीटिंग असून यात आयसीसी सर्व १२ सदस्य आणि २ सहसदस्य सामील होतील. तर आयसीसीचे चेअरमन मिळून वोटिंग मेबर्सची संख्या १६ होते. या बैठकीत तीन मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते.



हायब्रिड मॉडेल


पीसीबी जरी हायब्रिड मॉडेलचा स्वीकार करत नसले तरी गेल्या काही दिवसांपासून हायब्रिड मॉडेलची जोरदार चर्चा सुरू आहे. जर हायब्रिड मॉडेल लागू झाले तर भारताचे सामने यूएईला शिफ्ट कऱण्याची शक्यता आहे. हायब्रिड मॉडेल वापरले जाण्याची शक्यता अधिक कारण पीसीबीला चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन सोडायचे नाही तर भारताला सुरक्षा व्यवस्थेची काळजी आहे. अद्याप काही स्पष्ट नाही आहे.



संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानाबाहेर


पाकिस्तान कोणत्याही परिस्थिती हायब्रि़ड मॉ़डेलचा स्वीकार करत नसेल तर जबरदस्ती आयसीसीला पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन काढून घ्यावे लागेल. अशातच संपूर्ण स्पर्धा ही पाकिस्तानच्या बाहेर शिफ्ट केली जाऊ शकते. काही मिडिया रिपोर्ट्सनुसार अशी परिस्थिती आल्यास श्रीलंकेकडे यजमानपद दिले जाऊ शकते.



पाकिस्तान व्हावा भारत-पाक सामना


पाकिस्तानकडून मागणी केली जाऊ शकते की भारत-पाकिस्तान सामना असेल तर तो पाकिस्तानात खेळवला जावा. याशिवाय पीसीबीकडून हीदेखील मागणी होऊ शकते की फायनलचा सामनाही पाकिस्तानात खेळला जावा. दरम्यान, भारतीय संघाने बॉर्डर पार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे हा पर्याय रद्द होऊ शकतो.

Comments
Add Comment

DSP सिराजला पोलीस विभागाने केला या खास अंदाजात सलाम, मोठ्या कामगिरीसाठी दिल्या शुभेच्छा

मुंबई: मोहम्मद सिराजला DSP सिराज यासाठी म्हटले जाते कारण तेलंगणा पोलीसमध्ये तो डीएसपी पदावर आहे. या मोहम्मद

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची