Jogeshwari caves : पांडवकालीन जोगेश्वरी, अंधेरी गुंफांचे संवर्धन करा

जयंत चाळ, ब्राह्मण पुष्पकर्ण आदी चाळींचा रखडलेला पुनर्विकास मार्गी लावण्याची खासदार रविंद्र वायकर यांची मागणी


मुंबई : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभाअंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरी भागातील पांडवकालीन जोगेश्वरी (Jogeshwari caves) आणि अंधेरी गुंफा (Andheri caves) यांची देखभाल तसेच संवर्धन करण्याची मागणी खासदार रविंद्र वायकर यांनी लोकसभेत मांडली. गुंफेच्या परिसरातील झोपडपट्टीचे पुनर्वसन करून परिसराचे सुशोभीकरणाचीही मागणी त्यांनी केली आहे.


जोगेश्वरी भागातील पांडवकालीन गुंफा पाहण्यासाठी महाराष्ट्राबरोबर देश-विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. परंतू या दोन्ही गुंफाची देखभाल व संवर्धन करण्यात न आल्याने दोन्ही गुंफा जीर्ण अवस्थेत आहेत, असे वायकर म्हणाले.



या दोन्ही गुंफाच्यावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात झोपड्या वसल्या आहेत यात काही प्रमाणात वाढही होत आहे. या झोपड्यांचा पुनर्विकास करून चांगली पक्की घरे देणे अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी त्यांनी केली.


या भागातील जयंत चाळ, ब्राह्मण पुष्पकर्ण चाळ आदी चाळींच्या पुनर्विकास गेली अनेक वर्ष रखडला असून, तो मार्गी लावणेही अत्यंत गरजेचे आहे, अशी मागणी वायकर यांनी निवेदनाद्वारे केली असून हे निवेदन सभागृहात स्वीकारण्यात आले असून ते शुक्रवारी पटलावर ठेवण्यात आले.

Comments
Add Comment

‘ए मेरे वतन के लोगो’ आणि रोहित शर्मा; भावूक करणारा व्हिडिओ चर्चेत

मुंबई : रोहित शर्मा केवळ मैदानावरच नाही, तर मैदानाबाहेरही आपलं देशप्रेम वेळोवेळी व्यक्त करताना दिसतो. पुन्हा

मुंबई महापालिका क्षेत्रात १ लाख ६८ हजार दुबार मतदार

मुंबई : मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुबार मतदारांच्या छाननीत अखेर एक लाख ६८ हजार ३५०

पुण्यात महाविकास आघाडीत फूट, आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार

पुणे : पुण्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर होताच तासाभरात महाविकास आघाडी फूटली आहे. आम आदमी पक्षाने (आप)

Mumbai Local News : मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक; 'थर्टी फर्स्ट'साठी मात्र रेल्वेकडून खूशखबर

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वेच्या रूळांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी येत्या रविवार, २८

कबुतरांना दाणे घालणं पडलं महागात! बसला हजारोंचा दणका

मुंबई: कबुतरांमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याला धोका असल्याने कबुतरखाना बंद करण्याचा निर्णय मुंबई

New Year News Rules : नवं वर्ष, नवे नियम! १ जानेवारीपासून तुमचे आर्थिक गणित बदलणार; २०२६ मध्ये लागू होणारे 'हे' १० मोठे बदल!

मुंबई : वर्ष २०२५ ला निरोप देण्यासाठी आता अवघे ४ दिवस उरले असून, १ जानेवारी २०२६ पासून आपल्या दैनंदिन जीवनातील