Onion Rate: कांद्याला तीन हजारापेक्षा कमी भाव

सोलापूर: सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत ३५३ गाड्या कांद्याची आवक झाली होती. यंदा आवक कमी असूनही सरासरी भाव अडीच हजार ते २८०० रुपयांपर्यंतच स्थिर आहे. २० क्विंटल कांदा अक्षरश: ५०० रुपये दराने विकला गेला आहे. यावर्षी पावसामुळे हजारो शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच खराब झाला तर अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालेले नाही.



सततचा पाऊस व सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने कांदा खराब झाल्याच्या शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत. आज १० क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल साडेसहा हजार रुपयांचा दर मिळाला आहे. गुरुवारी सोलापूर बाजार समितीत एकूण ३५ हजार ३०७ क्विंटल (७० हजार ६१४ पिशवी) कांदा विक्रीसाठी आला होता. त्यातील ३५ हजार २७७ क्विंटल कांदा सरासरी दोन हजार ८०० रुपये दराने विकला गेला आहे.गतवर्षी याच हंगामात दररोज सोलापूर बाजार समितीत ७०० ते ८०० गाड्यांची आवक होती. परंतु, निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळाला नसल्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. आता निर्यातबंदी नसताना देखील भावात वधारणा झालेली नाही. दरम्यान, शेतकरी गडबड करून ओला कांदा विक्रीसाठी आणत असल्यानेही भाव वाढत नसल्याचे बाजार समितीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी वाळलेला कांदा आणावा, त्याला चांगला दर मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आता कर्करोग उपचार केंद्र! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सूचना

मुंबई: सध्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले असून, यामुळे दरवर्षी अनेक लोकं मृत्युमुखी पडत असल्याच्या घटना वाढत

साठवून ठेवलेला कांदा खराब होत असल्याने शेतकरी चिंतेत

धुळे : धुळे तालुक्यातील नगाव येथील शेतकरी दिनेश पाटील यांनी साधारण २० ते २५ क्विंटल कांदा हा उकिरड्यावर फेकला

रामटेक चित्रनगरीसाठी ६० एकर जमिनीचे येत्या १५ दिवसात हस्तांतरण : ॲड आशिष शेलार

रामटेक चित्रनगरी व संरक्षित स्मारक संवर्धनातून विकास व वारसा जपण्यात येईल : वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड.आशिष

Pune Crime News : नोटीस फाडली, पोलिसांवर कुत्र्यांचा हल्ला, वादग्रस्त IAS अधिकारी खेडकर कुटुंबाचा खतरनाक खेळ उघडकीस

पुणे : बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली आहे.

राज्यात टीईटी परीक्षा २३ नोव्हेंबरला

पुणे : इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गात अध्यापनासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार डरकाळी

 ताडोबा आणि पेंचमधून आठ वाघांचे टप्प्याटप्प्याने स्थलांतर सातारा : देशातील प्रमुख पाच व्याघ्र अभयारण्यांपैकी