Fangal Cyclone: फेंगल चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता

चेन्नई: तामिळनाडूला धडकणारे फेंगल चक्रीवादळ आगामी 24 तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवली आहे. उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारी भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागांत संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.




बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ 'फेंगल' तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांकडे येत आहे. त्यामुळे तामिळनाडून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार आणि व्यापक पावसाचा अंदाज आयएमडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. फेंगल चक्रीवादळ येत्या 24 तासांत तीव्र होण्याचा अंदाज आहे. "ते उत्तर-वायव्य दिशेने सरकत असून शनिवारी 30 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादाळामुळे, तामिळनाडूच्या बहुतेक भागांमध्ये पुढील 2-3 दिवसांत मोठ्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाखाली मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील, असे पुद्दुचेरी सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची तीव्रता वाढत असल्याने भारतीय नौदलाने सर्वसमावेशक आपत्ती प्रतिसाद योजना सक्रिय केली आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्लाही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला