Fangal Cyclone: फेंगल चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता

  137

चेन्नई: तामिळनाडूला धडकणारे फेंगल चक्रीवादळ आगामी 24 तासात अधिक तीव्र होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) वर्तवली आहे. उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेश किनारी भागांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच काही भागांत संभाव्य पूरपरिस्थिती निर्माण होण्याची देखील शक्यता आहे.




बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ 'फेंगल' तमिळनाडूच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांकडे येत आहे. त्यामुळे तामिळनाडून राज्यातील बहुतांश भागात मुसळधार आणि व्यापक पावसाचा अंदाज आयएमडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. फेंगल चक्रीवादळ येत्या 24 तासांत तीव्र होण्याचा अंदाज आहे. "ते उत्तर-वायव्य दिशेने सरकत असून शनिवारी 30 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत कराईकल आणि महाबलीपुरम दरम्यान ओलांडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादाळामुळे, तामिळनाडूच्या बहुतेक भागांमध्ये पुढील 2-3 दिवसांत मोठ्या ते मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.


बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाखाली मुसळधार पावसाचा अंदाज असल्याने केंद्रशासित प्रदेशातील सर्व शाळा आणि महाविद्यालये 30 नोव्हेंबरपर्यंत बंद राहतील, असे पुद्दुचेरी सरकारने जाहीर केले आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाची तीव्रता वाढत असल्याने भारतीय नौदलाने सर्वसमावेशक आपत्ती प्रतिसाद योजना सक्रिय केली आहे. तसेच मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्लाही अधिकाऱ्यांनी दिला आहे.

Comments
Add Comment

Uttarkashi Cloud burst: उत्तरकाशीच्या धारलीमध्ये ढगफुटी, डोंगरावरून वाहत आले हजारो टन पाणी, चार जणांचा मृत्यू, अनेक लोक ढिगाऱ्यात गाडले, पहा VIDEO

उत्तरकाशी: उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार पसरला आहे. येथील धारली गावात आलेल्या

माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

नवी दिल्ली: जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे मंगळवारी दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात

PM Modi : एनडीएच्या बैठकीत मोदींचा सत्कार; 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'महादेव'च्या यशावर अभिनंदनाचा वर्षाव! पाहा VIDEO

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली आज दिल्ली येथे झालेल्या एनडीए संसदीय

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती