Vinod Tawde : विनोद तावडे 'गेमचेंजर'! अमित शाहांसोबत रात्रीच्या बैठकीत नेमकी कोणती खलबतं झाली?

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारला जनादेश मिळाल्यानमतर आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाभोवती चर्चेने फेर धरला असतानाच भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची बुधवारी (२७ नोव्हेंबर) रात्री बैठक झाली. या भेटीत नेमकी काय झाली चर्चा, यावर आता राज्यात जोरदार चर्चा रंगलीय.


भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यात तब्बल ४० मिनिटे महत्त्वाची बैठक झाली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद आणि मराठा समीकरण यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.



या बैठकीत महाराष्ट्रात मराठेत्तर मुख्यमंत्री बनवल्यास मराठा समाज नाराजी होण्याची चिंता भाजपाला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवले गेले, तर मराठा मतपेढी कशापद्धतीने भाजपासोबत एकसंध ठेवता येईल, यावर चर्चा झाल्याचे समजते.


देवेंद्र फडणवीस यांची पुन्हा मुख्यमंत्रिपदी नियुक्ती केल्यास मराठा मतं कशी टिकवता येतील, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा-ओबीसी मतं, यावर दोघांमध्ये खलबतं झाली. २०१४ ते २०२४ या काळात मराठा समाजाची आंदोलनं, मराठा नेत्यांच्या भूमिका आणि कोर्टाचे निकाल शाहांनी जाणून घेतले. पक्षाच्या भविष्यासाठी मराठा चेहरा किती महत्त्वाचा आहे, याबाबतही राजकीय आकडेमोड करण्यात आली.


काल एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्रि‍पदावरील दावा सोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असे एकनाथ शिंदे म्हणाले. त्यानंतर आता शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे महायुतीचे नेते अंतिम निर्णयासाठी आज गुरुवारी दिल्लीला जाणार आहेत. आता मोदी-शाह कोणता निर्णय देतात या बाबत कमालीची उत्सुकता आहे.

Comments
Add Comment

आयएनएस ‘अरिदमन’ आणि ‘तारगिरी’ नौदलात दाखल

विशाखापट्टणम : आंध्रप्रदेशच्या विशाखापट्टणम येथे आयोजित नेत्रदीपक सोहळ्यात स्वदेशी बनावटीची आयएनएस अरिदमन ही

West Bengal : पश्चिम बंगाल : मालदा हिंसाचाराच्या सूत्रधाराला अटक

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यातील कालियाचक इथल्या हिंसाचाराचा सूत्रधार आणि एआयएमआयएम नेते

जन विश्वास विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर; वाहतूक कोंडी, ड्रायव्हिंग लायसन्सच्या नूतनीकरणात होणारा विलंब हे आता गुन्हे नाहीत

नवी दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांनी जन विश्वास विधेयकाला मंजुरी दिली. राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली की

संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते विशाखापट्टणममध्ये अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीचे आणि स्टेल्थ फ्रिगेटचे जलावतरण

विशाखापट्टणम : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज (शुक्रवार ३ एप्रिल २०२६) विशाखापट्टणममध्ये

PM Kisan Yojana 23rd Instalment: पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता 'या' महिन्यात मिळण्याची शक्यता

मुंबई: भारत हा कृषीप्रधान देश आहे. त्यामुळे लाखो लोक शेती करतात. त्यांच्यापैकी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न

Summer Special Train: उन्हाळ्यात घरी परतणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; मुंबई-पुणे दरम्यान २१०० हून अधिक विशेष गाड्या धावणार

मुंबई: उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी घरी परतण्याची योजना आखणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. मध्य रेल्वेने