Pune Crime : विकृतीचा कळस! चॉकलेटच्या बहाण्याने दोन मुलींवर शेजाऱ्यानेच केले अत्याचार

  180

पुणे : विद्येचे माहेरघर मानले जाणाऱ्या स्मार्ट पुणे (Pune News) शहरात साततत्याने अपघात, अत्याचार, खून, चोरी अशा घटना घडल्याचे समोर येत आहे. अशातच आता पुण्यातन विकृतीचा कळस असणारी बातमी (Pune Crime) समोर आली आहे. एका ६० वर्षीय नराधमाने शेजारी राहणाऱ्या चिमुकलींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. चॉकलेटच्या बहाण्याने नराधमाने दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुली घराबाहेर खेळत असताना शेजारी राहणाऱ्या ६० वर्षीय नराधमाने चॉकलेट खाण्याचे आमिष दाखवत त्यांना घरी नेले व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, पीडित मुलींच्या आईला हा प्रकार समजताच त्यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


लैंगिक अत्याचार केल्याची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त आर राजा (DCP R Raja) यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या पोलिसांनी नराधमाला अटक केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Pune Crime)

Comments
Add Comment

Marathi Cinema Screen Issue: मराठी सिनेमाचे अतिरिक्त शोज मल्टीप्लेक्समध्ये लागणार! शासनाचा सर्वात मोठा निर्णय

मराठी सिनेमा जगविण्यासाठी आणि वाढवण्यासाठी राज्य सरकार सुचवणार उपाययोजना मुंबई: मराठी सिनेमांना

'यात्री ॲप'वर करा एसटीचे बुकींग!

मुंबई : चालकाला सन्मानजनक मोबदला आणि प्रवाशांना सुरक्षित प्रवासाची हमी देणारे राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप

माधुरीला नांदणी मठात परत आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

राज्य शासन सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार - मुख्यमंत्री मुंबई : नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि.

मोठी अपडेट : आता दिवाळीनंतर फुटणार फटाके! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तारीख ठरली

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अखेर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य निवडणूक

पुण्यात भीषण अपघात: रक्षाबंधनाच्या आधीच बहीण-भावाची ताटातूट, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे : पुण्यामध्ये एका धक्कादायक अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय मंजूर

मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.