Pak vs Sri: पाकिस्तानात हिंसक आंदोलने, दौरा अर्धवट सोडून परतला श्रीलंकेचा संघ

मुंबई: चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन कोणत्या देशात होणार यावरून सातत्याने वाद सुरू आहे. मात्र त्याआधीच पाकिस्तानची स्थिती खूपच खराब होत चालली आहे. इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या राजकीयविरोधी आंदोलनाचा फटका खेळांवर दिसून येत आहे.


पाकिस्तानातील हिंसक आंदोलनामुळे श्रीलंकेच्या संघाने दौरा अर्धवट सोडत मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला. श्रीलंका ए संघाची वनडे मालिका पाकिस्तानात खेळवली जात होती. मात्र ही मालिका मध्येच सोडून श्रीलंकेचा संघ मायदेशी परतला आहे. याबाबत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बातचीत केल्याची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली.


या चर्चेनंतर या मालिकेतील दोन एकदिवसीय सामने रद्द करण्यात आले आहेत. हे दोन्ही सामने रावळपिंडीमध्ये खेळले जाणार होते. यानंतर आता ही मालिका पूर्ण करण्यासाठी भविष्यात कार्यवाही करण्यात येईल असे पाकिस्तान बोर्डाने सांगितले.


पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक ए इन्साफने रविवारपासून मुख्य इस्लामाबादच्या दिशेने विरोध प्रदर्शन सुरू केले आहे. या दरम्यान अनेक हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.

Comments
Add Comment

BCCI कडून विश्वविजेत्या टीम इंडियाला १३१ कोटींचं बक्षिस , परंतु प्रत्यक्षात एवढे पैसे मिळणार

मुंबई: टी२० विश्वचषक २०२६ मधील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर बीसीसीआयकडून बक्षिसांचा वर्षाव करण्यात आला

T20 World Cup 2026 : आयसीसी 'टीम ऑफ द टूर्नामेंट'मध्ये चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश

आयसीसीने टी-२० साठी सर्वोत्तम संघ निवडला असून या संघात चार भारतीय क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. संजू

आयसीसी आणि बीसीसीआय कडून खेळाडूंसाठी बक्षिसांचा पेटारा अखेर खुलला

अहमदाबाद : नरेंद्र मोदी स्टेडियम येथे रंगलेल्या ICC Men's T20 World Cup च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर दणदणीत विजय

Sri Lanka Cricket Team : विश्वचषकासाठी श्रीलंकेची जोरदार तयारी; प्रशिक्षकपदी केली 'या' महान खेळाडूची नियुक्ती

श्रीलंका क्रिकेटने दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांना नवीन मुख्य प्रशिक्षक

Indian Cricket Team : जागतिक क्रिकेटमध्ये भारताचाच दबदबा, दोन वर्षात सात ट्रॉफींवर कब्जा

गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. ज्यामुळे जागतिक क्रिकेटमध्ये भारताचे

विश्वविजेत्या भारतीय संघाच्या अभिनंदनाचा ठराव विधिमंडळात

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि बुमराहच्या कामगिरीचे केले कौतुक मुंबई : भारतीय