निर्गुणाची जाणीव ठेवून सगुणोपासनेत राहावे

अध्यात्म - ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज


समजा, आपल्याला एका गावाला जायचे आहे. त्या गावाला जाणारी आगगाडी धरून आपण तिची संगती करतो. आपले गाव आले की, आपण गाडी सोडतो. हे जसे खरे, त्याचप्रमाणे, निर्गुण हे आपले साध्य असले तरी आज आपल्याला सगुणच खरे मानून त्याची संगती केली पाहिजे. निर्गुणाशिवाय सगुण खरे नाही ही गोष्ट खरी; पण सगुण खरे धरून चालल्याशिवाय निर्गुणापर्यंत पोहोचता येणार नाही हेही तितकेच खरे. सगुणोपासनेत स्वत:चा विसर पडला की, एकीकडे ‘ मी ’ नाहीसा होतो आणि दुसरीकडे देव नाहीसा होतो, आणि शेवटी परमात्मा शिल्लक उरतो. म्हणूनच, आपण निर्गुणाची ओळख करून घेऊन सगुणात राहावे. स्वत:चा विसर जर रामाच्या पूजनात पडू लागला, तर निर्गुण आणखी दुसरे कोणते राहिले? परंतु ताप आलेल्या माणसाला ज्याप्रमाणे सर्व कडूच लागते, त्याप्रमाणे आमची वृत्ती विषयाकार झालेली, तिला सगुण, निर्गुण, दोन्ही कुठे गोड लागतात? ‘सगुणाशिवाय निर्गुण उपासना करतो’ म्हणतो, त्याला त्याचे मर्मच नाही कळले. वस्तुत: तो सगुण उपासनाच करीत असतो, पण त्याचे त्यालाच नाही कळत. स्थलात आणि कालात जे देवाला आणतात, त्यांनी त्याला सगुणात नाही आणले या म्हणण्यात काय अर्थ आहे?


परमार्थाविषयी आपल्या काही विचित्र कल्पना असतात. अगदी अडाणीपणा पत्करला, पण हे विपरीत ज्ञान नको. सूर्य हा आपल्या आधी होता, आज आहे आणि पुढेही राहणार आहे. तो नेहमीचाच असल्यामुळे त्याचे अस्तित्व आपल्या ध्यानात येत नाही, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. भगवंताच्या बाबतीत आपले तसेच घडते. एखादा नास्तिक जर म्हणाला की, ‘देव नाहीच; तो कुठे आहे हे दाखवा, ’ तर त्याला असे उत्तर देऊन अडविता येईल की, ‘ देव कुठे नाही हे दाखवा. ’ पण हा उत्तम मार्ग नव्हे. देव नाही असे म्हणणाऱ्यालासुद्धा, त्या स्वरूपाचे काही तरी आहे ही जाणीव असतेच; फक्त तो त्याला निरनिराळी नावे देतो. निसर्ग, शक्ती, सत्ता अशी नावे देऊन तो त्यांचे अस्तित्व मान्य करतो, पण ‘ देव ’ नाही असे तो म्हणतो. जे आहे असे त्याला वाटते तोच देव समजावा. मनुष्याला जितके ज्ञान असते तितके लिहिता येत नाही; जितके लिहिलेले असते तितके वाचणाऱ्याला समजत नाही; त्याला जितके समजलेले असते तितके सांगता येत नाही; आणि ऐकणाऱ्याला, तो जितके सांगतो तितके कळत नाही. म्हणून, मूळ वस्तूचे वर्णन स्वत: अनुभव घेऊनच समजावे. परमात्मा कर्ता आहे असे समजून, आपण आजचे कर्तव्य करीत राहावे.


तात्पर्य: निर्गुण हे दिसत नाही, कळत नाही. म्हणून ते अवताररूपाने, अथवा संतरूपाने, सगुणरूप घेऊन येते.

Comments
Add Comment

दिवाळी प्रकाशपर्व... सांस्कृतिक व अध्यात्मिक

मनाचा गाभारा : अर्चना सरोदे दिवाळी... सर्व सणांमधला सगळ्यात महत्त्वाचा सण. याला सणांचा राजा म्हटलं तरी काही वावगं

नैवेद्याची अर्पणयात्रा

ऋतुजा केळकर देवासमोर ठेवलेला नैवेद्य म्हणजे केवळ पाककृती नव्हे, तर एक भावनांची अर्पणयात्रा असते आणि त्या

महर्षी जमदग्नी

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी ‘जमदग्नीचा अवतार..’ असे म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर एखादी रागीट व्यक्ती उभी

कर्माचे उत्तराधिकारी

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य ‘कर्मण्येवाधिकारस्ये मा फलेषु कदाचन’ हे सर्वांना माहीत आहे. कर्माचे

नरकासुराचा वध, राजा बळीची पूजा, तेलाने स्नान... दक्षिण भारतात दिवाळीचा अनोखा उत्सव

दिवाळीचा सण जवळ येत आहे आणि संपूर्ण उत्तर भारत त्याच्या उत्साहात जोरदार तयारी करत आहे. नवरात्रीनंतरच्या करावा

महर्षी व्यास

(भाग तिसरा) भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी