MNS : मनसे आज पुण्यामध्ये करणार आत्मचिंतन

  75

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माणाची स्वप्ने पाहणाऱ्या मनसेला (MNS) विधानसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. २८८ पैकी १२८ जागा लढविलेल्या मनसेला एकही जागा जिंकता आली नाही. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील विधानसभेच्या मैदानात उतरले होते, मात्र मतदारांनी नाकारल्याने त्यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार मतदारसंघातून मनसेने उमेदवार निवडणुकीत उतरविले होते, मात्र तेथेही त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पार्श्वभूमीवर पक्षाला आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न आता पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरू केला आहे.



महायुतीत सहभागी होऊन निवडणूक लढवली जाईल, या भ्रमात पक्षाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहिले. त्यामुळे निवडणुकीची फारशी तयारी झाली नाही. याचा फटका विधानसभा निवडणुकीत बसला. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईत काही ठिकाणी मनसेचे उमेदवार निवडून येण्याची अपेक्षा पक्षाला होती. मात्र एकही जागा मनसेला मिळाली नाही.


निवडणुकीत पक्षाची (MNS) वाताहात झाली असून, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास ढळला आहे. या पार्श्वभूमीवर पराभवाचे आत्मचिंतन करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक गुरुवारी बोलवण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यालयात ही बैठक होण्याची शक्यता असून पुणे शहरातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील मनसेचे पराभूत उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Comments
Add Comment

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर १६ जुलैला होणार सुनावणी

नवी दिल्ली : शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने सर्वोच्च न्यायालयात पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत सुरू

विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या आड लपून राजकारण करु नये

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी - उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबई : शेतकरी

चंद्रपूरातील नाल्याच्या संरक्षण भिंतीचे प्रकरण विधानसभेत गाजले!

मुंबई: चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात हवेली गार्डन ते आकाशवाणी रोडवरील नाल्याच्या संरक्षण भिंतीच्या

कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी दरवर्षी करतात सहा हजाराहून अधिक वारकऱ्यांची सेवा

वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा, विठ्ठल मळ्यात जपलीय परंपरा..! १६ वर्षांची परंपरा; ४० दिंड्यांतील सहा हजार

Prasad Tamdar Baba : अंग चोळून अंघोळ अन् शरीरसंबंध; भोंदूबाबा प्रसादचे हायटेक कारनामे उघड

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील भोंदूबाबाच्या कारनाम्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. मोबाईलच्या

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

मुंबई : जलसंधारण विभागाला नव्याने ८,७६७ पदांचा आकृतीबंध तयार करून तो वित्त विभागाकडे सादर करण्यात आला होता. या