Helmet Rule : राज्यात दुचाकीस्वारांसह सहप्रवाशांना हेल्मेट बंधनकारक!

  173

राज्याचे अपर पोलीस महासंचालक अरविंद साळवे यांचे आदेश


पुणे : वाढत्या अपघाताच्या (Accident) पार्श्वभूमीवर दुचाकीस्वारांचा होणारा मृत्यू आणि गंभीर दुखापत याला आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग अीक्शन मोडवर आला आहे. पुण्यासह (Pune News) राज्यातील प्रमुख शहरांमध्ये आता दुचाकीस्वारांसह सहप्रवाशांनाही हेल्मेट बंधनकारक (Helmet Mandatory) करण्याचा निर्णय राज्याच्या वाहतूक विभागाने (Transport Department) घेतला आहे.



शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर दुचाकीस्वार विना हेल्मेट प्रवास करीत असल्याचे दिसून आले आहे. त्यासोबतच अपघातांमध्ये अनेकांना गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या सहप्रवाशांवर कारवाईचे आदेश अपर पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.


अद्यापही या आदेशाची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही. मात्र नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्याविरूद्ध ई- चलान मशीनमध्ये स्वतंत्र हेड खाली कारवाई केली जाणार आहे. पंरतु, या आदेशाची निश्चित तारीख जाहीर केलेली नाही.



हेल्मेटसक्तीवर पुणेकरांचा विरोध


राज्यासह अनेक महत्वाच्या शहरात हेल्मेटसक्तीला वारंवार विरोध केल्याचे दिसून आले आहे. मात्र, आता दुचाकीस्वारांचे वाढते अपघात लक्षात घेऊन संबंधितांनी हेल्मेट परिधान करण्यासाठी प्राधान्य द्यावे, यासाठी पोलीस प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार आदेशाची अमलबजावणी पुण्यातही केली जाण्याची शक्यता आहे. सध्या वाहतूक पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून विनाहेल्मेट दुचाकीस्वारावर कारवाई करत आहेत. दरम्यान, अपर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार विनाहेल्मेट दुचाकीस्वार, सहप्रवाशी कारवाईच्या जाळ्यात अडकले जाणार आहे. त्यामुळे याला पुणेकरांचा विरोधही होऊ शकतो, अशी शक्यता आहे. (Helmet Rule)

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या