Suicide: मुंबईत एअर इंडियाच्या पायलटची आत्महत्या, या कारणामुळे बॉयफ्रेंडला अटक

  225

मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात एअर इंडियाच्या पायलट सृ्ष्टी तुलीने आत्महत्या(Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २५ नोव्हेंबरला तिच्या भाड्याच्या घरात तिचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या तपासात तिने ही आत्महत्या बॉयफ्रेंडसोबतच्या भांडणामुळे केल्याचे समोर आले आहे. या प्रकऱणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपी बॉयफ्रेंड आदित्य पंडित(२७) याला अटक केली आहे.


आदित्य गेल्या काही काळापासून तिच्या घरी येत जात असे. रविवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास भांडणानंतर आदित्य मुंबई सोडून दिल्लीसाठी रवाना झाला. यामुळे त्रस्त झालेल्या सृष्टीने त्याला फोन करून सांगितले की ती आत्महत्या करत आहे. मात्र त्याने परत येण्यास नकार दिला. दरम्यान, काही काळाने तो परतला तेव्हा सतत प्रयत्न करूनही त्याला दरवाजा खोलता आला नाही.


यावेळेस त्याने चावीवाल्याला बोलवत घराचा दरवाजा खोलून घेतला. त्यावेळी दरवाजा उघडला असता सृष्टी बेशुद्ध पडलेली असल्याचे त्याने पाहिले. त्याने तातडीने तिला मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर रुग्णालयाने पोलीस तसेच कुटुंबियांना माहिती दिली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.



सृष्टी तुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी २६ नोव्हेंबरला आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात सादर केले असता त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांना फ्लॅटमध्ये कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.