Suicide: मुंबईत एअर इंडियाच्या पायलटची आत्महत्या, या कारणामुळे बॉयफ्रेंडला अटक

मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात एअर इंडियाच्या पायलट सृ्ष्टी तुलीने आत्महत्या(Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २५ नोव्हेंबरला तिच्या भाड्याच्या घरात तिचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या तपासात तिने ही आत्महत्या बॉयफ्रेंडसोबतच्या भांडणामुळे केल्याचे समोर आले आहे. या प्रकऱणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपी बॉयफ्रेंड आदित्य पंडित(२७) याला अटक केली आहे.


आदित्य गेल्या काही काळापासून तिच्या घरी येत जात असे. रविवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास भांडणानंतर आदित्य मुंबई सोडून दिल्लीसाठी रवाना झाला. यामुळे त्रस्त झालेल्या सृष्टीने त्याला फोन करून सांगितले की ती आत्महत्या करत आहे. मात्र त्याने परत येण्यास नकार दिला. दरम्यान, काही काळाने तो परतला तेव्हा सतत प्रयत्न करूनही त्याला दरवाजा खोलता आला नाही.


यावेळेस त्याने चावीवाल्याला बोलवत घराचा दरवाजा खोलून घेतला. त्यावेळी दरवाजा उघडला असता सृष्टी बेशुद्ध पडलेली असल्याचे त्याने पाहिले. त्याने तातडीने तिला मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर रुग्णालयाने पोलीस तसेच कुटुंबियांना माहिती दिली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.



सृष्टी तुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी २६ नोव्हेंबरला आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात सादर केले असता त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांना फ्लॅटमध्ये कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.

Comments
Add Comment

मुंबईहून सुटणाऱ्या लोकमान्य टिळक एक्सप्रेसचा अपघात टळला

मुंबई : उत्तर प्रदेशमधील चित्रकूट येथे एक मोठा रेल्वे अपघात टळला. मुंबईहून भागलपूरला जाणारी लोकमान्य टिळक

मुंबईत घर घेण्याचं स्वप्न स्वप्नच रहाणार, ४२६ फ्लॅट्सची सोडत, पण किंमती आवाक्याबाहेर? वाचा A टू Z

मुंबईत ‘घर’ का परवडेना? किंमत ५४ लाखांपासून १ कोटीपर्यंत! मग 'अत्यल्प व अल्प उत्पन्न' गटाचा नेमका अर्थ काय? मुंबई :

मुंबईमध्ये उभारणार आलिशान 'मरिना'! समुद्र पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाचे महत्त्वाचे पाऊल

मुंबई: मुंबईला लाभलेल्या अथांग समुद्राचा आणि समुद्रकिनाऱ्यांचा, समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर

मुंबईत इंडिया मेरिटाईम वीक परिषदेचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : दशकभरात केंद्र सरकारने मेरिटाईम अर्थात सागरी अर्थव्यवस्थेत केलेल्या धोरणात्मक सुधारणांमुळे आज भारत

Ajinkya Rahane : अजिंक्य रहाणेची झुंजार खेळी! १५९ धावांची खेळी करून रहाणेचं मोठं स्टेटमेंट; रोहित-विराटचा दाखला देत टीम इंडियात पुनरागमनाचा ठोकला दावा

मुंबई : रणजी ट्रॉफी २०२५-२६ (Ranji Trophy 2025-26) हंगामाच्या दुसऱ्या राऊंडमध्ये मुंबई संघ (Mumbai Team) छत्तीसगड (Chhattisgarh) विरुद्ध आपला

Kabutarkhana : 'गरज पडल्यास शस्त्र'...कबुतरखान्यांवरील बंदीवरून जैन समाज पुन्हा आक्रमक; जैन मुनींचा थेट 'आमरण उपोषणाचा' इशारा

मुंबई : मुंबईतील कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे जैन समाज (Jain Community) आक्रमक झाला आहे. या