Suicide: मुंबईत एअर इंडियाच्या पायलटची आत्महत्या, या कारणामुळे बॉयफ्रेंडला अटक

मुंबई: मुंबईतील अंधेरी पूर्व परिसरात एअर इंडियाच्या पायलट सृ्ष्टी तुलीने आत्महत्या(Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. २५ नोव्हेंबरला तिच्या भाड्याच्या घरात तिचा मृतदेह आढळला. पोलिसांच्या तपासात तिने ही आत्महत्या बॉयफ्रेंडसोबतच्या भांडणामुळे केल्याचे समोर आले आहे. या प्रकऱणी कारवाई करताना पोलिसांनी आरोपी बॉयफ्रेंड आदित्य पंडित(२७) याला अटक केली आहे.


आदित्य गेल्या काही काळापासून तिच्या घरी येत जात असे. रविवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास भांडणानंतर आदित्य मुंबई सोडून दिल्लीसाठी रवाना झाला. यामुळे त्रस्त झालेल्या सृष्टीने त्याला फोन करून सांगितले की ती आत्महत्या करत आहे. मात्र त्याने परत येण्यास नकार दिला. दरम्यान, काही काळाने तो परतला तेव्हा सतत प्रयत्न करूनही त्याला दरवाजा खोलता आला नाही.


यावेळेस त्याने चावीवाल्याला बोलवत घराचा दरवाजा खोलून घेतला. त्यावेळी दरवाजा उघडला असता सृष्टी बेशुद्ध पडलेली असल्याचे त्याने पाहिले. त्याने तातडीने तिला मरोळच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. यानंतर रुग्णालयाने पोलीस तसेच कुटुंबियांना माहिती दिली. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.



सृष्टी तुलीच्या कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी २६ नोव्हेंबरला आरोपीविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यानंतर बुधवारी आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात सादर केले असता त्याला २९ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे. पोलिसांना फ्लॅटमध्ये कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही.

Comments
Add Comment

आता मेट्रो तिकीट Uber वर; प्रवाश्यांना तिकीटासह मिळणार नवीन सवलती

मुंबई : मुंबई मेट्रोने प्रवाशांसाठी डिजिटल सुविधांमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता मेट्रोचे तिकीट थेट Uber

सुषमा अंधारे यांच्या 'त्या' आरोपांवर रुपाली चाकणकर यांचं स्पष्टीकरण; "मी असं काहीही..."

मुंबई : नाशिकमधील अंकशास्त्रज्ञ अशोक खरात प्रकरणामुळे सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याचाच परिणाम

महाराष्ट्रात हवामानाचा उलटसुलट खेळ; काही ठिकाणी उष्णतेचा तडाखा, तर ७ जिल्ह्यांत गारपिटीचा धोका

मुंबई : राज्यात सध्या हवामानात सतत बदल होत असून हवामानाचा खेळ पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी उष्णतेची तीव्रता

रेमंडचे एमडी गौतम सिंघानिया यांचा अपघात स्पीडबोट उलटली अन्.... दोघे जण बेपत्ता

मुंबई : उद्योग क्षेत्रातील प्रमुख नाव असलेले रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया हे मालदीवमध्ये

प्रलंबित मागण्यांसाठी 'बेस्ट'मधील विविध संघटनांचे अतिरिक्त आयुक्तांकडे गाऱ्हाणे

मुंबई : बेस्ट उपक्रमातील प्रलंबित मागण्यांकडे बेस्ट प्रशासन व मुंबई महानगरपालिकेचे दुर्लक्ष झाल्यामुळे बेस्ट

...तर गारगाई धरणाचा प्रस्ताव रद्द होणार?

नव्याने निविदा मागवून कंपनीची निवड केली जाण्याची शक्यता मुंबई :  गारगाई नदीवर प्रस्तावित धरण प्रकल्पाच्या