ICC test Rankings: अव्वल स्थानाजवळ पोहोचला यशस्वी जायसवाल

मुंबई: आयसीसी(ICC) द्वारे जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये भारताचा फलंदाज यशस्वी जायसवालला(yashaswi jaiswal) जबरदस्त फायदा मिळाला आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी २०२४मधील पहिल्या कसोटीत शानदार १६१ धावांची खेळी करण्याचा फायदा जायसवालला मिळाला आहे. आता तो कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्याला भले प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळआला नसला तरी त्याने टीम इंडियाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.


यशस्वी जायसवालचे रेटिंग ८२५ झाले आहे. मात्र कसोटी फलंदाजींच्या रँकिंगमध्ये इंग्लंडचा ज्यो रूटने दबदबा बनवला आहे. जायसवालने दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. मात्र रेटिंगच्या बाबतीत तो अद्याप रूटपेक्षा मागे आहे. पर्थ कसोटीबाबत बोलायचे झाल्यास जायसवालला पहिल्या डावात मिचेल स्टार्कने शून्यावर बाद केले होते. मात्र दुसऱ्या डावात त्याने १६१ धावांची खेळी केली. सोबत केएल राहुलसोबत भागीदारी करताना २०१ धावा केल्या.



विराट कोहलीलाही बंपर फायदा


एकीकडे यशस्वी जायसवालला शतकी खेळीचा फायदा मिळाला आहे. यानंतर तो फलंदाजांच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर आला आहे. टॉप १० मध्ये ऋषभ पंतचाही समावेश आहे. तो आधी प्रमाणेच सहाव्या स्थानावर कायम आहे. पर्थ कसोटीत पंतने पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे १ आणि ३७ धावांची खेळी केली होती. त्यानंतर नंबर येतो तो विराट कोहलीचा. पआर्थ कसोटीच्या आधी तो टॉप २०मध्ये सामील नव्हता. मात्र कसोटी क्रिकेटमधील ३०व्या शतकामुळे त्याला रँकिंगमध्ये ९व्या स्थानांचा फायदा आहे.

Comments
Add Comment

'शार्दुल ठाकूर' मुंबई रणजी संघाचा नवा कर्णधार; अजिंक्य रहाणेनंतर मिळाली सूत्रे!

मुंबई: भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याची आगामी रणजी करंडक (Ranji Trophy) हंगामासाठी मुंबई क्रिकेट संघाने

रहस्यमय 'TEN x YOU' चा पडदा उघडला! सचिन तेंडुलकरने लाँच केला खेळाडूंच्या अनुभवातून जन्माला आलेला ब्रँड

२५ वर्षांचा अनुभव, भारतीय शरीरयष्टीनुसार खास डिझाईन; 'गल्ली ते स्टेडियम' प्रत्येक खेळाडूसाठी नवी क्रांती मुंबई:

IND vs WI: पहिला दिवस यशस्वीच्या नावावर, टीम इंडिया मजबूत स्थितीत

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ

रवींद्र जडेजा आपला ‘गुरू’ - कुलदीप यादव

अहमदाबाद : भारतीय संघाचा गोलंदाज कुलदीप यादव यांनी एक मोठं विधान केलं आहे. त्यांनी संघातील अनुभवी गोलंदाज

भारताला वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २-0 ने जिंकण्याची संधी

नवी दिल्ली : पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघाने डावाने विजय मिळवला होता. आता टीम इंडिया आता

IND vs SA: वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेने रोखला भारताचा विजयरथ, मिळवला ३ विकेटनी विजय

विशाखापट्टणम: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५मध्ये द. आफ्रिकेच्या संघाने भारतीय संघाचा विजयरथ रोखला आहे.