विधानसभा निकालानंतर महायुतीच्या विधान परिषदेतील ६ जागा रिक्त

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून २३० जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने १३२, शिवसेना (शिंदे गट) ने ५७, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने ४१ जागा जिंकल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त ४६ जागा मिळाल्या असून काँग्रेसला १६, ठाकरे गटाला २० आणि शरद पवार गटाला १० जागांवर समाधान मानावे लागले.


या विजयामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणे निश्चित आहे. विधानसभेतील निकालानंतर विधान परिषदेतील ६ जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके तसेच शिवसेनेचे आमश्या पाडवी आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे विधानसभेसाठी निवडून आले आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील या जागांसाठी आता नव्या नेत्यांची निवड होणार आहे. महायुतीतील तीनही पक्ष या रिक्त जागांसाठी संभाव्य उमेदवार निश्चित करण्यासाठी लॉबिंग करत आहेत.


विशेषतः विधानसभेचे तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांना शांत करण्यासाठी या जागांचा उपयोग होणार आहे. भाजपकडून अधिक वजनदार नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित गट) देखील नाराजांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या सर्वांचे लक्ष महायुतीच्या निर्णयाकडे लागले आहे. कोणते नेते या लॉटरीतून विधान परिषदेवर पोहोचतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

Zero SPAD : EMU Local च्या सिग्नल प्रणालीत सुधारणा, मध्य रेल्वेचा सुरक्षिततेवर भर

मुंबई : मध्य रेल्वेने मुंबई उपनगरीय रेल्वेतील प्रवासी आणि रेल्वे संचालनाची सुरक्षितता अधिक बळकट करण्यासाठी

Supriya Sule : पुणे-मुंबई प्रवासादरम्यान सुप्रिया सुळे यांच्या गाडीला अपघात; सीट बेल्टमुळे मोठा अनर्थ टळला

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या गाडीचा पुणे-मुंबई महामार्गावर

BMC News : नगरसेवकांना गृहीत धरून काम करू नका; महापौरांनी अधिकाऱ्यांचे टोचले कान

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मागील पावणे चार वर्षे नगरसेवक नव्हते म्हणून महापालिका प्रशासनातील अधिकारी जर आता

BMC News : महापालिकेचा अर्थसंकल्प मंजूर, आता नगरसेवकांना विकास निधी वापरण्याचे खाते झाले खुले !

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मांडलेले सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाज

BMC News : मुंबईतील घटनांवर पाहण्याची महापालिकेची दृष्टी झाली अंधूक

- आपत्कालिन नियंत्रण कक्षातील व्हिडीओ वॉलची गुणवत्ता खालावली मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील सर्व ठिकाणांवर

Megablock : ठाणे ते वाशी पाच तास रेल्वे सेवा बंद राहणार, तर मध्य रेल्वेवरही रविवारी मेगाब्लॉक

मुंबई : 'नीट' परीक्षेमुळे गेल्या रविवारी रेल्वेने मेगाब्लॉक रद्द केला होता. मात्र, या रविवारी (१० मे) रेल्वेच्या