विधानसभा निकालानंतर महायुतीच्या विधान परिषदेतील ६ जागा रिक्त

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून २३० जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने १३२, शिवसेना (शिंदे गट) ने ५७, तर राष्ट्रवादी (अजित पवार गट) ने ४१ जागा जिंकल्या. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त ४६ जागा मिळाल्या असून काँग्रेसला १६, ठाकरे गटाला २० आणि शरद पवार गटाला १० जागांवर समाधान मानावे लागले.


या विजयामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणे निश्चित आहे. विधानसभेतील निकालानंतर विधान परिषदेतील ६ जागा रिक्त झाल्या आहेत. यामध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, गोपीचंद पडळकर, रमेश कराड आणि प्रविण दटके तसेच शिवसेनेचे आमश्या पाडवी आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर हे विधानसभेसाठी निवडून आले आहेत. त्यामुळे विधान परिषदेतील या जागांसाठी आता नव्या नेत्यांची निवड होणार आहे. महायुतीतील तीनही पक्ष या रिक्त जागांसाठी संभाव्य उमेदवार निश्चित करण्यासाठी लॉबिंग करत आहेत.


विशेषतः विधानसभेचे तिकीट न मिळालेल्या नाराज नेत्यांना शांत करण्यासाठी या जागांचा उपयोग होणार आहे. भाजपकडून अधिक वजनदार नेत्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी (अजित गट) देखील नाराजांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या सर्वांचे लक्ष महायुतीच्या निर्णयाकडे लागले आहे. कोणते नेते या लॉटरीतून विधान परिषदेवर पोहोचतात, हे लवकरच स्पष्ट होईल.

Comments
Add Comment

BMC News : सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागातील स्वच्छतेवर भर द्या, अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या प्रत्येक विभागाच्या सहायक आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील

BMC : महापालिका आयुक्तांच्या भेटीनंतर अतिरिक्त आयुक्तांची रुग्णालयात धाव

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी विराजमान झाल्यानंतर आश्विनी भिडे यांनी महापालिका

Water Cut : दक्षिण मुंबईत बुधवारी पाणीकपात होणार, नागरिकांचे हाल होणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवडी येथील टनल भंडारवाडा टेकडी जलाशय वाहिनीवर हाजीबंदर मार्ग

Railway News : कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या आणि सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड 'वंदे भारत'च्या वेळेत बदल

मुंबई : कोकण रेल्वेच्या काही गाड्यांच्या आणि सीएसएमटी- हुजूर साहेब नांदेड 'वंदे भारत'च्या वेळेत बदल करण्यात आला

Mumbai Crime : मुंबईत भोंदू फकीर अटकेत; उपचाराच्या नावाखाली महिलांवर अत्याचाराचा आरोप

मुंबई : नाशिक आणि संगमनेरमधील भोंदूबाबांच्या प्रकरणांची चर्चा अजून थंड झालेली नसतानाच मुंबईतही अशाच प्रकारचे

Vasai : वसईत मत्स्य प्रशिक्षण केंद्रासाठी जागा निश्चिती करण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : पालघर जिल्ह्यातील वसई येथे मत्स्य प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी जागा निश्चित करावी. या केंद्रासाठी