GPSच्या भरवश्यावर जात होती कार, अचानक पूल संपला आणि ३ जणांचा मृत्यू

लखनऊ : जीपीएस(GPS) सिस्टीमच्या भरवश्यावर आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे जीवावरही बेतू शकते. उत्तर प्रदेशात ही हैराणजनक घटना घडली आहे. यात लग्न सोहळ्याला जात असलेल्या कारमधल तीन मित्रांचा मृत्यू झाला. कुटुंबियांचा दावा आहे की ही घटना जीपीएस सिस्टीममुळे घडली. कारण कार जीपीएस सिस्टीमच्या मदतीने जात होती.



अपघाताप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी कार पुलावरून रामगंगा नदीत पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांना संशय आहे की ड्रायव्हर जीपीएस सिस्टीममुळे असुरक्षित मार्गावर गेला. ही घटना खालपूर-दातागंज मार्गावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.


मिळालेल्या माहितीनुसार, सर्कल ऑफिसर आशुतोष शिवम म्हणाले, या वर्षाच्या सुरूवातीला पुरामळे पूलाचा पुढचा भाग नदीत पडला. मात्र हा बदल सिस्टीममध्ये अपडेट करण्यात आला नव्हता. पोलिसांनी सांगितले की ड्रायव्हर नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर करत होता. त्यामुळे पूल असुरक्षित असल्याचे त्याला समजले नाही. यामुळे कार कोसळली. या दुर्घटनेत कारमधील तिघांचा मृत्यू झाला.


कार नदीत पडल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. यानंतर कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले.

Comments
Add Comment

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने

JEE Mains Response Sheet 2026 : जेईई (मुख्य) सत्र १ ची उत्तरतालिका आणि रिस्पॉन्स शीट आज जाहीर; 'असा' तपासा तुमचा स्कोअर

नवी दिल्ली : अभियांत्रिकी (Engineering) प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या जेईई (मुख्य) JEE Main 2026 (सत्र १) परीक्षेची

Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोदी-शहांचे निमंत्रण; दिल्लीत राजकीय हालचालींना वेग!

मुंबई : अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली असली तरी,

देशात पुन्हा परतणार पाऊस; 'या' ९ राज्यात वादळी वाऱ्यासह दमदार पावसाची हजेरी

नवी दिल्ली : देशातील बहुतांश राज्यात फेब्रुवारीत एरवी पाऊस पडत नाही. पण बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या