लखनऊ : जीपीएस(GPS) सिस्टीमच्या भरवश्यावर आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणे जीवावरही बेतू शकते. उत्तर प्रदेशात ही हैराणजनक घटना घडली आहे. यात लग्न सोहळ्याला जात असलेल्या कारमधल तीन मित्रांचा मृत्यू झाला. कुटुंबियांचा दावा आहे की ही घटना जीपीएस सिस्टीममुळे घडली. कारण कार जीपीएस सिस्टीमच्या मदतीने जात होती.
अपघाताप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी कार पुलावरून रामगंगा नदीत पडल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. पोलिसांना संशय आहे की ड्रायव्हर जीपीएस सिस्टीममुळे असुरक्षित मार्गावर गेला. ही घटना खालपूर-दातागंज मार्गावर सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्कल ऑफिसर आशुतोष शिवम म्हणाले, या वर्षाच्या सुरूवातीला पुरामळे पूलाचा पुढचा भाग नदीत पडला. मात्र हा बदल सिस्टीममध्ये अपडेट करण्यात आला नव्हता. पोलिसांनी सांगितले की ड्रायव्हर नेव्हिगेशन सिस्टीमचा वापर करत होता. त्यामुळे पूल असुरक्षित असल्याचे त्याला समजले नाही. यामुळे कार कोसळली. या दुर्घटनेत कारमधील तिघांचा मृत्यू झाला.
कार नदीत पडल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली. यानंतर कारमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि पोस्टमार्टेमसाठी पाठवण्यात आले.
उच्च न्यायालयाकडून कारवाईला स्थगिती मुंबई : विलेपार्ले येथील दिगंबर जैन मंदिर तोडक कारवाईप्रकरणी पालिकेचे विभाग…
स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर डायरेक्टोरेट ऑफ इर्फोसमेन्ट (ईडी)ने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली सोनिया गांधी व…
मुंबई : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्याची इच्छा असलेल्या महाराष्ट्रातील युवक-युवतींसाठी…
दक्षिण भारतीय साईभक्तांकडून सर्वाधिक मुकुट शिर्डी : ज्यांच्या चरणी श्रद्धा आणि सबुरीने नतमस्तक झाल्यावर माणसाचं…
'शिट्टी वाजली रे' ला टक्कर द्यायला आला नवीन शो मुंबई: सध्या मराठी वाहिन्यांवर नवनवीन मालिका…
मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण…