Raj Thackeray MNS : राज ठाकरेंचं इंजिन चिन्ह धोक्यात; मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता!

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निकालात (Assembly Election 2024) महायुती (Mahayuti) सरकार बहुमताने विजयी झाले आहे. परंतु दुसरीकडे राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) मनसेला (MNS) मोठा फटका बसला आहे. मनसे पक्षाकडून १२८ जागांवर उमेदवार निवडणूक लढवत होते. मात्र एकही आमदार विजयी होऊ न शकल्यामुळे राज ठाकरे यांना मोठा धक्का सहन करावा लागत आहे. अशातच मनसे पक्षाची मान्यता आता रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



मनसेचा पक्ष धोक्यात का?


निवडणूक आयोगाच्या (Election Commision) निकषानुसार, एखाद्या पक्षाला मान्यता टिकवायची असल्यास त्या पक्षाला एकूण ८ टक्के मतदान आणि १ जागा किंवा २ जागा आणि ६ टक्के मतदान किंवा ३ जागा आणि ३ टक्के मतदान यापैकी एक निकष त्या पक्षानं पूर्ण करणं आवश्यक आहे. मात्र मनसेला एकही जागा मिळाली नसून ४८ लाख मते देखील मिळाली नाहीत, त्यामुळे मनसे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते, असे विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी सांगितले.



मान्यता रद्द झाल्यास काय परिणाम होणार?


मान्यता रद्द होणे म्हणजे पक्षाचे चिन्ह धोक्यात येणे. म्हणजेच राज ठाकरेंच इंजिन चिन्ह धोक्यात येऊ शकतं यापुढे त्यांना ते चिन्ह मिळू शकणार नाही. पुढील निवडणूक लढवण्यास राज ठाकरे यांना दुसरे चिन्ह घ्यावे लागेल.

Comments
Add Comment

देवेंद्र फडणवीसांच्या एका कॉलनं बदलला निर्णय, प्राजक्त तनपुरेंनी राहुरी पोटनिवडणुकीतून घेतली माघार

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार अर्ज भरण्याची मुदत सोमवारी संपुष्टात आली आहे. या निवडणुकीत दिवंगत

Nagpur Crime : नागपूर हादरलं! पैशांसाठी १४ वर्षीय मित्राची निघृण हत्या

नागपूर : नागपूर शहरात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शहराला हादरवून सोडणाऱ्या १४ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि

Gautami patil : गौतमी पाटीलच्या 'या' नवीन गाण्यानं घातला धूमाकूळ

मुंबई : आपल्या मनमोहक अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकणारी महाराष्ट्राची लाडकी नृत्यागंणा गौतमी पाटील ( Gautami Patil ) चा

Gautami Patil : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर गौतमी पाटीलनं दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

नाशिक : नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरातचे दिवसेंदिवस अनेक काळे कारनामे समोर येत असून महिला लैंगिक शोषण, आर्थिक

Bigg Boss Marathi 6 : पहिला फायनलिस्ट कोण ठरणार ? तिकीट टू फिनालेची उत्सुकता वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन आता शेवटच्या टप्प्यात पोहचलं असून ११ जानेवारी २०२५ रोजी सुरु झालेल्या बिग बॉस मराठी

Ramayana Movie : रामायणमध्ये भूमिका साकारणार बिग बींचा जावई, 'या' महत्वाच्या भूमिकेत झळकणार

मुंबई : रामायण ( Ramayana ) सिनेमाची सध्या जोरदार चर्चा सुरु असून रामायणमधील रणबीर कपूर ( Ranbir Kapoor) चा पहिला लूक पाहिल्यानंतर