नववर्षाच्या सुरुवातीला लागू होणार TRAIचे 'हे' नवे नियम!

पाहा कोणाला होणार फायदा?


मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून (TRAI) सातत्याने नवे अपडेट्स जारी होत असतात. अशातच आता पुन्हा टीआरएआयचे नवे नियम (TRAI New Rule) लागू होणार आहेत. देशभरातील दूरसंचार सेवांच्या सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने नवीन दूरसंचार नियम लागू करण्याचे आदेश दिले आहेत.



मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वेगवेगळ्या राज्यामध्ये परवानगीसाठी वेगवेगळे नियम आणि शुल्क आहेत, ज्यामुळे कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आता मोबाईल नेटवर्कसाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर उभारणीसाठी 'राईट ऑफ वे' (RoW) हा नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. यामुळे देशभरातील सर्व दूरसंचार कंपन्यांना एकसमान शुल्क आकारण्यात येणार आहे.


दरम्यान, हे नियम जिओ (JIO), एअरटेल (Airtel), बीएसएनएल (BSNL) आणि व्होडाफोन-आयडिया (Vi) या कंपन्यांसाठी लागू होणार असून नववर्षापासून टीआरएआयची नवी नियमावली जारी होणार आहे.



काय फायदा होणार?


ROW नियमानुसार, परवानगी मिळवण्याची प्रक्रिया डिजिटल पद्धतीने होणार आहे. यामुळे राज्य सरकारांकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्यांमध्ये पारदर्शकता येणार असून प्रक्रिया जलद व सोपी होईल. तसेच 5G टॉवर्सच्या उभारणीला गती मिळणार आहे.



मोबाईल वापरकर्त्यांना काय लाभ होईल ?



  • वेगवान नेटवर्क : 5G सेवेचा विस्तार जलद होईल.

  • उत्तम कनेक्टिव्हिटीः  देशभरात नेटवर्कची गुणवत्ता सुधारेल.

  • पारदर्शक सेवाः  डिजिटल परवानगी प्रक्रियेमुळे ग्रहिकांना अखंड सेवा मिळेल. (TRAI New Rule)

Comments
Add Comment

Pharmacy Sector: 'औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम २०२५' लागू

नवी दिल्ली :  देशातील लाखो औषधनिर्मात्यांसाठी (Pharmacists) एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे.

Kolkata building collapse : भीषण दुर्घटना! बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली

ताराताला परिसरात मोठी दुर्घटना, अनेक जण जखमी कोलकाता : पश्चिम बंगालची (West Bengal) राजधानी कोलकाता (Kolkatta) येथे बुधवारी

LOC News : भारताकडून सिंधू नदीचे पाणी रोखल्यानंतर LoC वर पाकिस्तानची मोठी सैन्यबांधणी! ३५ अँटी-ड्रोन युनिट तैनात

- AI फेन्सिंगसह युद्धसज्जतेला वेग नवी दिल्ली : भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानकडे जाण्यापासून रोखल्यानंतर आणि

Jharkhand T20 League : झारखंड टी-२० लीग फायनलला गालबोट! स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी; ३५ जण जखमी

रांची : झारखंडची राजधानी रांची येथे झारखंड टी-२० लीगच्या (Jharkhand T20 League) अंतिम सामन्यादरम्यान मोठी दुर्घटना घडली.

Fire Accident :लखनऊ कोचिंग क्लास आगप्रकरणी चौघांना अटक, चार अधिकारी निलंबित

लखनऊ(Lucknow) : अलीगंज (सेक्टर-डी) येथे एका कोचिंग सेंटरला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेने संपूर्ण उत्तर प्रदेश

Amit Shah : नाफेडच्या लिलाव पोर्टलचा शुभारंभ

नवी दिल्ली : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ