IND vs AUS: ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला कर्णधार रोहित शर्मा? अ‍ॅडलेड कसोटीत खेळणार

मुंबई: भारताचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियासाठी रवाना झाला आहे. पर्थमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत रोहित खेळत नाही आहे. रोहितची पत्नी रितीका सजदेहने नुकताच एका मुलाला जन्म दिला. रोहित याच कारणामुळे ऑस्ट्रेलियाला गेला नव्हता. मात्र एका रिपोर्टनुसार आता तो रवाना झाला आहे. तसेच अ‍ॅडलेडमध्ये खेळवल्या जाणाऱ्या सामन्याचा तो भाग होईल. टीम इंडिया रोहितच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात खेळत आहे.


रोहितचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. रोहित लवकरच टीम इंडियासोब दिसेल. दरम्यान, भारतीय संघ सध्या पर्थमध्ये आहे. येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे.


रोहितसाठी मागील मालिका काही खास नव्हती. भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. रोहितने न्यूझीलंडविरुद्ध बंगळरू कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकले होते. या खेळीनंतर तो सतत फ्लॉप राहिला. त्याने पुणे कसोटीत ८ धावा केल्या होत्या. यानंतर मुंबई कसोटीत पहिल्या डावात १८ धावा आणि दुसऱ्या डावात ११ धावा केल्या होत्या.आता रोहित ऑस्ट्रेलियाविरुद्ध कमबॅक करू शकतो.


पर्थमध्ये खेळवल्या जात असलेल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. टीम इंडियाने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या डावात शानदार कमबॅक केले. भारताने एकही विकेट न गमावता १७२ धावा केल्या आहेत. भारतीय संघ सध्या २१८धावांच्या आघाडीवर आहे.

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए