मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया(AUS vs IND) यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू झाला आहे.आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने अडीचशेच्या जवळपास आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवालने षटकार ठोकत शतक पूर्ण केले. यासोबतच देवदत्त पड्डिकलही खेळपट्टीवर टिकून आहे.
यशस्वी जायसवालने २०६ बॉलमध्ये ८ चौकार आणि ३ षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपला षटकार ठोकत शतकी सलामी दिली.
भारतीय संघाने गेल्या २ दौऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात घरात हरवले होते. यावेळेस हॅटट्रिकची संधी आहे. या महामालिकेत एकूण ५ सामने खेळवले जाणार आहेत. मालिकेतील पुढील कसोटी सामना ६ डिसेंबरला अॅडलेडमध्ये होणार आहे.
पर्थ कसोटीत भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करतआहे. दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने दुसऱ्या डावात कोणताही विकेट न गमावता १७२ धावा केल्या होत्या. आज दुसऱ्या डावात भारताला पहिला झटका केएलच्या रूपात बसला. त्याने ७७ धावा केल्या.
माझे कोकण: संतोष वायंगणकर गरिबी आहे, घरची परिस्थिती नाही यामुळे पुढे शिक्षण घेता येत नाही…
वैशाली शिरोडकर: पहलगाम निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण वरुथिनि एकादशी, शके १९४७. शततारका नक्षत्र. योग ब्रम्हा. चंद्र राशी…
भारताचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाममध्ये मंगळवारी दहशवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करून २८ जणांची…
हैदराबाद: इंडियन प्रीमियर लीग २०२५मधील ४१व्या सामन्यात आज २३ एप्रिलला मुंबई इंडियन्स संघाने सनरायजर्स हैदराबादला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली…