AUS vs IND: षटकारासह यशस्वीचे दमदार शतक, भारताकडे अडीचशे पार आघाडी

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया(AUS vs IND) यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू झाला आहे.आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने अडीचशेच्या जवळपास आघाडी घेतली आहे. तिसऱ्या दिवशी भारताचा सलामीवीर यशस्वी जायसवालने षटकार ठोकत शतक पूर्ण केले. यासोबतच देवदत्त पड्डिकलही खेळपट्टीवर टिकून आहे.

यशस्वी जायसवालने २०६ बॉलमध्ये ८ चौकार आणि ३ षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. त्याने आपला षटकार ठोकत शतकी सलामी दिली.

भारतीय संघाने गेल्या २ दौऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्यात घरात हरवले होते. यावेळेस हॅटट्रिकची संधी आहे. या महामालिकेत एकूण ५ सामने खेळवले जाणार आहेत. मालिकेतील पुढील कसोटी सामना ६ डिसेंबरला अॅडलेडमध्ये होणार आहे.

पर्थ कसोटीत भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करतआहे. दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने दुसऱ्या डावात कोणताही विकेट न गमावता १७२ धावा केल्या होत्या. आज दुसऱ्या डावात भारताला पहिला झटका केएलच्या रूपात बसला. त्याने ७७ धावा केल्या.

 
Comments
Add Comment

शुभमन गिल बाहेर; साई सुदर्शनला मिळणार कसोटीची संधी

गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी

भारताचा आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश

दोहा : भारताने आपला दुसरा सामना जिंकून आशिया कप रायझिंग स्टार्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दोहा स्टेडियमवर

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.