मुंबईत महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

मुंबई : विधानसभा निवडणूकीत मुंबईमध्ये महायुतीचं निर्विवाद वर्चस्व दिसून आलं आहे. मुंबई शहर आणि उपनगर या दोन्ही जिल्हयातल्या मिळून एकूण ३६ जागांपैकी २४ जागांवर महायुतीनं आघाडी घेतली आहे. त्यातही मुंबई उपनगर विधानसभा मतदारसंघात २६ पैकी २० जागा मिळवत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं तर मुंबई शहरातल्या १० पैकी ४ जागा महायुतीनं जिंकल्या आहेत.


मुंबईत भाजपाला सर्वाधिक १५, शिवसेनेला ६, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १०, काँग्रेसला ३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर यश मिळालं आहे. एका जागी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. भाजपाचे मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, विद्या ठाकूर, संजय उपाध्याय विजयी झाले आहेत. तर वरळीतून आदित्य ठाकरे विजयी झाले तर, वांद्रे पूर्व इथुन वरुण सरदेसाई विजयी झालेत. वांद्रे पश्चिममधुन आशिष शेलार विजयी झाले आहेत.



माहिममधुन महेश सावंत विजयी झाले आहेत, मनसेच्या अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. अणुशक्तीनगर इथुन सना मलिक तर मानखुर्द शिवाजीनगर इथुन समाजवादी पक्षाचे अबु आझमी विजयी झाले आहेत. विक्रोळी मतदारंसघातून सुनिल राऊत विजयी झाले आहेत.

Comments
Add Comment

खाजगी कौशल्य विद्यापीठ सुधारणा विधेयक परिषदेत मंजूर

मुंबई : राज्यातील कौशल्य विकास आणि रोजगारनिर्मितीला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत खाजगी कौशल्य

ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांना मोठी भेट

मुंबई : ठाणे महानगरपालिकेतील 'गट ड' श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेला

म्हाडा गाळेधारकांना मोठा दिलासा! भाडेकरार धोरणासाठी विशेष समिती स्थापन करणार; मंत्री शंभूराज देसाईंची विधान परिषदेत माहिती

मुंबई : मुंबईसह राज्यातील म्हाडा वसाहतींमध्ये भाडेतत्त्वावर व्यवसाय करणाऱ्या गाळेधारकांच्या अनेक वर्षांच्या

राज्यातील कापूस खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्राकडे मागणी; मंत्री जयकुमार रावल यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि जास्तीत जास्त कापूस सरकारी दराने खरेदी केला जावा,

सहकार क्षेत्र अधिक गतिमान करण्यासाठी लवकरच सर्वसमावेशक नवे सहकार धोरण; सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

मुंबई : सहकार क्षेत्र हे सामाजिक, आर्थिक परिवर्तनाचे मॉडेल आहे. राज्यातील सहकार क्षेत्र अधिक सक्षम, पारदर्शक आणि

माजलगाव वाळू तस्करी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल - मुख्यमंत्री

मुंबई : बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे कथित पोलिसांच्या संगनमतातून सुरू असलेल्या वाळू तस्करी प्रकरणात संशयित तीन