मुंबई : विधानसभा निवडणूकीत मुंबईमध्ये महायुतीचं निर्विवाद वर्चस्व दिसून आलं आहे. मुंबई शहर आणि उपनगर या दोन्ही जिल्हयातल्या मिळून एकूण ३६ जागांपैकी २४ जागांवर महायुतीनं आघाडी घेतली आहे. त्यातही मुंबई उपनगर विधानसभा मतदारसंघात २६ पैकी २० जागा मिळवत महायुतीनं घवघवीत यश मिळवलं तर मुंबई शहरातल्या १० पैकी ४ जागा महायुतीनं जिंकल्या आहेत.
मुंबईत भाजपाला सर्वाधिक १५, शिवसेनेला ६, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला १०, काँग्रेसला ३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला एका जागेवर यश मिळालं आहे. एका जागी अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. भाजपाचे मंगलप्रभात लोढा, राहुल नार्वेकर, विद्या ठाकूर, संजय उपाध्याय विजयी झाले आहेत. तर वरळीतून आदित्य ठाकरे विजयी झाले तर, वांद्रे पूर्व इथुन वरुण सरदेसाई विजयी झालेत. वांद्रे पश्चिममधुन आशिष शेलार विजयी झाले आहेत.
माहिममधुन महेश सावंत विजयी झाले आहेत, मनसेच्या अमित ठाकरे यांचा पराभव झाला आहे. अणुशक्तीनगर इथुन सना मलिक तर मानखुर्द शिवाजीनगर इथुन समाजवादी पक्षाचे अबु आझमी विजयी झाले आहेत. विक्रोळी मतदारंसघातून सुनिल राऊत विजयी झाले आहेत.
प्रा. नंदकुमार काकिर्डे मोदी सरकारने सुरू केलेल्या काही योजना देशातील सर्वसामान्यांपर्यंत चांगल्या रीतीने पोहोचल्या असून…
उमेश कुलकर्णी जागतिक व्यापार संघटनेला ट्रम्प यांच्या टॅरिफ राजवटीने एक मोठा झटका दिला आहे. त्याविरोधात…
डॉ. सर्वेश सुहास सोमण, samrajyainvestments@gmail.com शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणूक ही नेहमीच फायद्याची ठरत आलेली आहे.…
महेश देशपांडे सरत्या आठवड्यामध्ये ऑटो जगताच्या दृष्टीने काही महत्त्वाच्या बातम्या समोर आल्या. पहिली म्हणजे ग्रामीण…
- अल्पेश म्हात्रे, मुंबई डॉट कॉम मुंबईची दुसरी लाईफ लाईन असलेल्या बेस्ट उपक्रमाबद्दल गेले महिनाभर…
- सुनील जावडेकर सत्ताकारणाला समाजकारणाची जोड दिली तर एखादा राजकीय नेता त्याच्या आयुष्यात काय चमत्कार…