नवी दिल्ली : वाराणसीतील ज्ञानवापी संकुलाशी संबंधित प्रकरणावर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. हिंदू पक्षाने ज्ञानवापीशी संबंधित सर्व १५ खटले अलाहाबाद उच्च न्यायालयात वर्ग करावेत, जेणेकरून त्यांची एकत्रित सुनावणी होईल, अशी मागणी केली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयाने मुस्लिम पक्षाला नोटीस बजावली आहे. मुस्लिम पक्षाला २ आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.
ज्ञानवापीशी संबंधित ९ खटले वाराणसी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात तर ६ खटले दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग, वाराणसी यांच्या न्यायालयात सुरू आहेत. गेल्या महिन्यात याचिकाकर्त्या लक्ष्मी देवी आणि अन्य तीन महिलांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी ज्ञानवापीशी संबंधित काही प्रकरणे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग, जिल्हा न्यायाधीश यांच्या न्यायालयात प्रलंबित असल्याचे म्हटले होते. पुनर्विचार याचिकांसह काही प्रकरणे अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…