Alandi Yatra : आळंदी यात्रेसाठी पीएमपीच्या सुटणार जादा बस!

पुणे : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी यात्रेसाठी (Alandi Yatra) येत्या रविवारपासून शुक्रवारपर्यंत पीएमपीच्या (PMP Bus) ३४३ जादा बस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरित करून काटेवस्ती येथून बसेसचे संचलन करण्यात येत आहे.



यात्रेदरम्यान मंगळवार (ता. २६), बुधवार (ता. २७) व शुक्रवारी (ता. २८) रात्र बससेवा सुरू करण्यात येणार आहे. आळंदी यात्रेसाठी स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, महापालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी या स्थानकांवरून जादा बस सुटणार आहेत. याच स्थानकांवरून भाविकांच्या गर्दीनुसार रात्र बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


ही विशेष बससेवा रात्री १० नंतर सुरू होईल. त्यासाठी नियमित तिकीट दरापेक्षा ५ रुपये अधिक तिकीट दर आकारणी होईल. तसेच एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक व इतर पासधारकांस यात्रा कालावधीत रात्री १० नंतरच्या जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही. (Alandi Yatra)

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये