Alandi Yatra : आळंदी यात्रेसाठी पीएमपीच्या सुटणार जादा बस!

पुणे : कार्तिकी एकादशी (Kartiki Ekadashi) आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज (Dnyaneshwar Maharaj) यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी यात्रेसाठी (Alandi Yatra) येत्या रविवारपासून शुक्रवारपर्यंत पीएमपीच्या (PMP Bus) ३४३ जादा बस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनिमित्ताने आळंदी गावातील सध्याचे बसस्थानक स्थलांतरित करून काटेवस्ती येथून बसेसचे संचलन करण्यात येत आहे.



यात्रेदरम्यान मंगळवार (ता. २६), बुधवार (ता. २७) व शुक्रवारी (ता. २८) रात्र बससेवा सुरू करण्यात येणार आहे. आळंदी यात्रेसाठी स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, महापालिका भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी, रहाटणी या स्थानकांवरून जादा बस सुटणार आहेत. याच स्थानकांवरून भाविकांच्या गर्दीनुसार रात्र बससेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


ही विशेष बससेवा रात्री १० नंतर सुरू होईल. त्यासाठी नियमित तिकीट दरापेक्षा ५ रुपये अधिक तिकीट दर आकारणी होईल. तसेच एकदिवसीय, साप्ताहिक, मासिक, ज्येष्ठ नागरिक व इतर पासधारकांस यात्रा कालावधीत रात्री १० नंतरच्या जादा बससेवेसाठी पासचा वापर करून प्रवास करता येणार नाही. (Alandi Yatra)

Comments
Add Comment

ST Bus : उत्पन्नाच्या तुलनेत 'एसटी'ला दररोज २ कोटींचा तोटा

- महसूल वाढीसाठी इंधन विक्री क्षेत्रात उतरणार; परिवहन मंत्री सरनाईक यांनी आखली विशेष योजना मुंबई : राज्याची

अस्पृश्यता आणि विषमता हा मानवतेविरुद्धचा सर्वात मोठा अपराध

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; चवदार तळे सत्याग्रह शताब्दी वर्षानिमित्त विविध प्रकल्पांचे भूमिपूजन मुंबई :

डिझेल खरेदीतून वर्षाला २४१ कोटी रुपयांची बचत होणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली माहिती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) आर्थिक स्थिती सक्षम करण्यासाठी पर्यायी उत्पन्न स्रोत

पुणे-सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, ओव्हरटेकच्या नादात...

पुणे: पुणे-सोलापूर महामार्गावर पाटसजवळ एका भीषण अपघाताने प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. सोलापूरहून

अशोक खरातचे ५८ व्हिडीओ कसे समोर आले?, प्रकरणात नवा ट्विस्ट

नाशिक: राजकारण्यांना स्वप्न दाखवणाऱ्या तथाकथित ज्योतिषी आणि अंकशास्त्रज्ञ अशोक खरात याला बलात्काराच्या गंभीर

गडचिरोली : ११ जहाल माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

- गडचिरोली पोलीस सीआरपीएफ यांच्या संयुक्त प्रयत्नांना मोठे यश एकेकाळी माओवाद्यांचा बालेकिल्ला समजल्या