Onion Price: कांद्याचे भाव स्थिर करण्याकरिता केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

लासलगाव : किरकोळ बाजारात सध्या कांद्याचे दर स्थिर करण्याकरिता बफरस्टॉक मधील अधिक कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.यासाठी किरकोळ बाजारामध्ये दर स्थिर ठेवण्याकरिता तात्पुरता पुरवठा केला जाणार आहे.यामुळे कांद्याच्या दरावर केंद्र लक्ष ठेवून आहे.


केंद्राच्या प्राप्त माहितीनुसार, दिल्लीतील कांद्याचे किरकोळ विक्री दर ६५ रुपये प्रतिकिलो इतके असून देशभरात सरासरी ५८ रुपये इतका दर आहे.यामुळे सरकारने बफर स्टॉकमधील कांद्याचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला असून सणासुदीचा हंगाम व बाजार बंदी झाल्यामुळे काही बाजारांमधील कांद्याच्या पुरवठ्यात अडथळे येत होते. या पुरवठ्यामुळे ते अडथळे दूर होणार आहेत.


नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा दर स्थिर करण्यासाठी दिल्लीत दोन व गुवाहाटीत एक रेक पाठविण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याप्रमाणे,बाजारात कांद्याची उपलब्धता होण्याकरिता रस्ते वाहतुकीद्वारे सुद्धा पुरवठा वाढण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्याचबरोबर ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून रस्ते व रेल्वे वाहतुकीद्वारे कांद्याचा पुरवठा केल्यामुळे उपलब्धतेत वाढ होईल असे म्हटले आहे. शिवाय सरकारने चंदीगढ़, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्लीसारख्या शहरांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता सोनीपत येथे शीतगृहात ठेवलेला कांदा बाजारात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सरकारने यंदा ४.७ लाख टन रब्बी कांदा खरेदी करून तो बफर स्टॉप केला आहे. ५ सप्टेंबर रोजी किरकोळ विक्रीद्वारे ३५ रुपये प्रतिकिलो दराने व देशभरातील प्रमुख मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीद्वारे सुरुवात झाली होती. बफर स्टॉकमधील खरेदी केलेला दीड लाख टन अधिक कांदा नाशिक व इतर ठिकाणा वरून ट्रकद्वारे ग्राहक केंद्रांवर पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज, ९ ऑक्टोबर पासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर येत आहेत. ११

ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उत्तराखंडात बर्फवृष्टी, नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा

दार्जिलिंग (वृत्तसंस्था): ऑक्टोबरच्या उत्तराखंडात सुरुवातीलाच मोठ्या बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे. चाळीस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'झोहो' मेल स्वीकारला, 'स्वदेशी' तंत्रज्ञानाला दिला जोर

नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आता ई-मेलसाठी गूगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या परदेशी

भारतीय वायु दलाचा ९३वा वर्धापन दिन! हवाई दलाच्या शौर्याचे प्रदर्शन करणारे 'हे' चित्रपट पाहाच

वायु मार्गाद्वारे देशाचे रक्षण करणाऱ्या हवाईदलाचा आज ९३ वा वर्धापन दिन आहे. स्वातंत्र्यापूर्व काळात

मोदी सरकारची रेल्वेच्या २४ हजार ६३४ कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी, महाराष्ट्राच्या वर्धा - भुसावळ तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला मंजुरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक केंद्रीय समितीने रेल्वे

बिलासपूरमध्ये भूस्खलनाचा भीषण अपघात; बसवर दरड कोसळल्याने १५ प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू, बचाव कार्य सुरू

बिलासपूर: हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर