Onion Price: कांद्याचे भाव स्थिर करण्याकरिता केंद्र सरकारने घेतला हा निर्णय

लासलगाव : किरकोळ बाजारात सध्या कांद्याचे दर स्थिर करण्याकरिता बफरस्टॉक मधील अधिक कांदा बाजारात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.यासाठी किरकोळ बाजारामध्ये दर स्थिर ठेवण्याकरिता तात्पुरता पुरवठा केला जाणार आहे.यामुळे कांद्याच्या दरावर केंद्र लक्ष ठेवून आहे.


केंद्राच्या प्राप्त माहितीनुसार, दिल्लीतील कांद्याचे किरकोळ विक्री दर ६५ रुपये प्रतिकिलो इतके असून देशभरात सरासरी ५८ रुपये इतका दर आहे.यामुळे सरकारने बफर स्टॉकमधील कांद्याचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतला असून सणासुदीचा हंगाम व बाजार बंदी झाल्यामुळे काही बाजारांमधील कांद्याच्या पुरवठ्यात अडथळे येत होते. या पुरवठ्यामुळे ते अडथळे दूर होणार आहेत.


नाफेडच्या माध्यमातून खरेदी केलेला कांदा दर स्थिर करण्यासाठी दिल्लीत दोन व गुवाहाटीत एक रेक पाठविण्याचे नियोजन करण्यात आले असून त्याप्रमाणे,बाजारात कांद्याची उपलब्धता होण्याकरिता रस्ते वाहतुकीद्वारे सुद्धा पुरवठा वाढण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्याचबरोबर ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून रस्ते व रेल्वे वाहतुकीद्वारे कांद्याचा पुरवठा केल्यामुळे उपलब्धतेत वाढ होईल असे म्हटले आहे. शिवाय सरकारने चंदीगढ़, पंजाब, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, दिल्लीसारख्या शहरांच्या गरजा पूर्ण करण्याकरिता सोनीपत येथे शीतगृहात ठेवलेला कांदा बाजारात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


सरकारने यंदा ४.७ लाख टन रब्बी कांदा खरेदी करून तो बफर स्टॉप केला आहे. ५ सप्टेंबर रोजी किरकोळ विक्रीद्वारे ३५ रुपये प्रतिकिलो दराने व देशभरातील प्रमुख मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात विक्रीद्वारे सुरुवात झाली होती. बफर स्टॉकमधील खरेदी केलेला दीड लाख टन अधिक कांदा नाशिक व इतर ठिकाणा वरून ट्रकद्वारे ग्राहक केंद्रांवर पाठवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

माजी एनआयए प्रमुख सदानंद दातेंची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

मुंबई : माजी एनआयए प्रमुख सदानंद दाते यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती

अयोध्येत रामलल्लाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली : अयोध्येत रामलल्लाच्या अर्थात प्रभू रामाच्या प्राण-प्रतिष्ठापनेच्या दुसऱ्या वर्धापनदिनाच्या

स्वच्छ शहर इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मृत्यू, प्रशासनावर गंभीर आरोप

इंदूर : देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदूरमध्ये दूषित पाण्यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे.

तिथीनुसार आज राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! अयोध्येत आनंदाचे वातावरण

अयोध्या: समस्त हिंदूंच्या संस्कृतीचे प्रतिक असलेल्या राम मंदिराचा आज दुसरा वर्धापन आहे. तिथीनुसार म्हणजेच

रोखीपेक्षा डिजिटलला पसंती

एका वर्षात २,३६० एटीएमना टाळे एटीएम बंद करण्यात खासगी बँका आघाडीवर नवी दिल्ली : डिजिटल पेमेंटच्या वाढत्या

सीमा सुरक्षा दल राबवणार 'ऑपरेशन सर्द हवा', घुसखोरांना दिसताक्षणी ठार करणार

श्रीनगर : सीमा सुरक्षा दल (Border Security Force / BSF) सीमेवर जम्मू काश्मीरमध्ये 'ऑपरेशन सर्द हवा' आणि राजस्थानमध्ये 'ऑपरेशन कोल्ड