IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून रंगणार पहिली कसोटी

मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया(IND vs AUS) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या दृष्टीने ही मालिका अतिशय महत्त्वाची आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना ७.५० मिनिटांनी सुरू होईल.


टीम इंडिया जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वात मैदानात उतरणार आहे. रोहित शर्मा या सामन्यात खेळणार नाही. भारतीय संघासमोर या सामन्यात नक्कीच मोठे आव्हान असणार आहे. अनुभवी खेळाडू शुभमन गिल सामन्यातून बाहेर आहे. रोहित आणि गिलच्या अनुपस्थितीत देवदत्त पड्डिकलला संघात स्थान मिळाले आहे. टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मध्ये हर्षित राणाचाही समावेश होऊ शकतो.



भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संभाव्य प्लेईंग ११


भारत : यशस्वी जयसवाल, केएल राहुल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल, नितीश कुमार रेड्डी, रविचंद्रन अश्विन, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज/हर्षित राणा


ऑस्ट्रेलिया : उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, मिशेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिशेल स्टार्क, पॅट कमिंस (कर्णधार), नाथन लायन, जोश हेजलवुड



भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा


२२-२६ नोव्हेंबर - पहिली कसोटी, पर्थ
६-१० डिसेंबर - दुसरी कसोटी, एडिलेड
१४-१८ डिसेंबर - तिसरी कसोटी, ब्रिस्बेन
२६-३० डिसेंबर - चौथी कसोटी, मेलबर्न
३ ते ७ जानेवारी - पाचवी कसोटी, सिडनी

Comments
Add Comment

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि

WPL 2026 Final: स्मृती मनधानाच्या आरसीबीची विजयी घोडदौड सुरूच; दुसऱ्यांदा पटकावलं WPL चं जेतेपद

वडोदरा: चार आठवड्यांच्या लढतीनंतर, महिला प्रीमियर लीग २०२६ चा गुरुवार ५ फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील बीसीए