Reshma Shide : रेश्मा शिंदे पुन्हा अडकणार लग्नबंधनात!

केळवणाचे फोटो व्हायरल


मुंबई : सध्या कलाविश्वातील (Entertainment News) अनेक सेलिब्रिटी लग्न करत आहेत. अशातच लगोरी, रंग माझा वेगळा, घरोघरी मातीच्या चुली अशा मालिकेत मुख्य भुमिका साकारलेली रेश्मा शिंदे (Reshma Shinde) पुन्हा लग्नबंधनात (Marriage) अडकणार असल्याचे समोर आले आहे. रेश्माचे केळवण (Kelvan) पार पडले असून याबाबतचे तिचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल झाले आहेत.



नुकतेच ‘रंग माझा वेगळा’ (Rang Maza Vegla) मालिकेतील कलाकारांनी रेश्माचे केळवण केले आहे. यामध्ये रेश्माचे जवळचे कलाकार मित्रही उपस्थित होते. 'जीवनात ही घडी अशीच राहू दे' हॅशटॅग डियर समवन असे कॅप्शन देत अभिनेत्री रेश्माने पोस्ट शेअर केली आहे. दरम्यान, नात्याबद्दल कोणतीही हिंट न देता तिच्या केळवणाचे फोटो समोर आल्यानं चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.





रेश्माच्या (Reshma Shide) केळवणाचे फोटो समोर आल्यानंतर आता रेश्माच्या आयुष्यातला तो कोण? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये रेश्माच्या जोडीदाराबद्दल मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु झाल्या आहेत.

Comments
Add Comment

पैशाचं सोंग कमी पडलं...!

भालचंद्र कुबल, पाचवा वेद आम्हा नाट्यनिरीक्षकांना सालाबादप्रमाणे यंदाही मागील वर्ष नाट्यसृष्टीस कसं गेलं? याचा

निर्मितीवस्था आणि पंचनायिका...!

राज चिंचणकर, राजरंग रंगभूमीवर नाटक सादर होत असताना, रंगमंचाच्या मागे दुसरे नाट्य घडत असते आणि त्या नाट्याचा

हेमंत ढोमेच्या सिनेमाची धडाकेबाज कमाई ; लवकरच पार करणार १ कोटींचा आकडा

KJVMM Box Office: वर्षाच्या पहिल्याच दिवशी मराठी शाळेतल्या पोरांनी बॉक्स ऑफिस गाजवलं मुंबई: महाराष्ट्रात आज 'मराठी भाषा'

दीपिकाला सोडून आता संदीप रेड्डी वांगांच्या ‘स्पिरिट’मध्ये ‘नॅशनल क्रश’ ची एंट्री

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या संदीप रेड्डी वांगा यांच्या आगामी ‘स्पिरिट’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे.

प्लंबिंगपासून ते दिग्दर्शनापर्यंतचा प्रवास, ‘रुबाब’मधून मराठी सिनेसृष्टीत नव्या दिग्दर्शकाची एन्ट्री

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत नवनव्या विषयांसोबतच स्वतःच्या संघर्षातून घडलेले नवे दिग्दर्शक आपली ओळख निर्माण

अभिनेता शाहरुख खान वादाच्या भोवऱ्यात ..त्या निर्णयामुळे शाहरुख खान अडचणीत ?

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा कायमच चर्चेत असलेले नाव आहे.मात्र,आता शाहरुख खान मोठ्या अडचणीत फसला.हेच नाही तर