IPL 2025च्या आधी रजत पाटीदार बनला कर्णधार, RCBने दिल्या शुभेच्छा

मुंबई: आयपीएल २०२५(IPL 2025) स्पर्धा जवळ येत चालली आहे. स्पर्धेच्या आधी मेगा लिलाव होणार आहे. यात अनेक खेळाडूंवर बोली लागणार आहे. मात्र त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळणाऱ्या रजत पाटीदारला कर्णधार बनवल्याची बातमी समोर आली आहे. खुद्द आरसीबीने पाटीदारला कर्णदार बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.


खरंतर, रजत पाटीदारला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४साठी मध्य प्रदेशचे कर्णधारपद देण्यात आले आहे. रजत मध्य प्रदेश संघाकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतो. शानदार कामगिरीमुळे त्याला मुश्ताक अली ट्रॉफीसाठी नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरूवात २३ नोव्हेंबरपासून होईल. तर स्पर्धेचा फायनल सामना १५ डिसेंबरला खेळवला जाईल.



आरसीबीने केले रिटेन


आयपीएल २०२४मध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या रजत पाटीदारला आरसीबीने आयपीएल २०२४ साठी रिटेन केले आहे. रजतने आरसीबीसाठी २०२४च्या हंगामात १५ सामन्यांपैकी १३ डावांत ३०.३८च्या सरासरीने आणि १७७.१३च्या स्ट्राईक रेटने ३९५ धावा केल्या होत्या. यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे.


आरसीबीकडून केवळ तीन खेळाडूंना रिटेन करण्यात आले. यात विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांचा समावेश आहे. गेल्या हंगामात संघाचे नेतृत्व करणाऱ्या फाफ डू प्लेसिसला फ्रेंचायजीने रिलीज केले. अशातच आता २०२५ मध्ये आरसीबीचे नेतृत्व कोण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

टी-२० सामन्याची तिकीट विक्री सुरू असताना चाहत्यांवर लाठीचार्ज

कटक : भारतात क्रिकेट केवळ एक खेळ नसून तो धर्म आहे. या शब्दाची सत्यता पुन्हा एकदा ओडिशातील कटक शहरात सिद्ध झाली. ९

विराटचा दोन डावातील सलग ११ शतकांचा विक्रम

मुंबई  :  विराट कोहलीने त्याचे ५३वे एकदिवसीय शतक झळकावले आहे. रायपूरमध्ये सुरू असलेल्या दक्षिण

आयसीसी क्रमवारीत कोहलीची विराट भरारी

मुंबई : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकतीच

दक्षिण आफ्रिकेच्या टी - २० मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर

फिटनेसवर ठरणार शुभमन गिलचा निर्णय नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेच्या टी-२० मालिकेसाठी आता भारताचा संघ जाहीर

एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने साधली बरोबरी

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दक्षिण

रायपूर ODI : द. आफ्रिकेपुढे ३५९ धावांचे लक्ष्य

रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना