IPL 2025च्या आधी रजत पाटीदार बनला कर्णधार, RCBने दिल्या शुभेच्छा

मुंबई: आयपीएल २०२५(IPL 2025) स्पर्धा जवळ येत चालली आहे. स्पर्धेच्या आधी मेगा लिलाव होणार आहे. यात अनेक खेळाडूंवर बोली लागणार आहे. मात्र त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी खेळणाऱ्या रजत पाटीदारला कर्णधार बनवल्याची बातमी समोर आली आहे. खुद्द आरसीबीने पाटीदारला कर्णदार बनल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.


खरंतर, रजत पाटीदारला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४साठी मध्य प्रदेशचे कर्णधारपद देण्यात आले आहे. रजत मध्य प्रदेश संघाकडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळतो. शानदार कामगिरीमुळे त्याला मुश्ताक अली ट्रॉफीसाठी नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची सुरूवात २३ नोव्हेंबरपासून होईल. तर स्पर्धेचा फायनल सामना १५ डिसेंबरला खेळवला जाईल.



आरसीबीने केले रिटेन


आयपीएल २०२४मध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या रजत पाटीदारला आरसीबीने आयपीएल २०२४ साठी रिटेन केले आहे. रजतने आरसीबीसाठी २०२४च्या हंगामात १५ सामन्यांपैकी १३ डावांत ३०.३८च्या सरासरीने आणि १७७.१३च्या स्ट्राईक रेटने ३९५ धावा केल्या होत्या. यात ५ अर्धशतकांचा समावेश आहे.


आरसीबीकडून केवळ तीन खेळाडूंना रिटेन करण्यात आले. यात विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल यांचा समावेश आहे. गेल्या हंगामात संघाचे नेतृत्व करणाऱ्या फाफ डू प्लेसिसला फ्रेंचायजीने रिलीज केले. अशातच आता २०२५ मध्ये आरसीबीचे नेतृत्व कोण करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

युवराज सिंगनं काय केलं... ? ईडीनं विचारला जाब

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याला बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप 1xBet प्रकरणात ईडीने समन्स बजावले आहे.

Asia Cup: टीम इंडियाने सुपर ४ साठी केले क्वालिफाय, पाकिस्तानचे काय होणार?

दुबई: टीम इंडियाने आशिया कप २०२५च्या सुपर ४ साठी क्वालिफाय केले आहे. आता या ग्रुपमधून दुसरा कोणता संघ क्वालिफाय

पाकिस्तानशी हस्तांदोलन न केल्याबद्दल टीम इंडियावर कारवाई होणार?

नवी दिल्ली: काल भारत आणि पाकिस्तान या दरम्यान दुबईत झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत सूर्याच्या टीमने

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून सूर्याने पाकिस्तानी खेळाडूंशी हात नाही मिळवला, सांगितले हे कारण

मुंबई: आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात भारताने ७ विकेट राखत विजय मिळवला. या

IND vs PAK: भारताने पाकड्यांना धुतले, ७ विकेट राखत मिळवला विजय

दुबई: आशिया कप स्पर्धेतील सहाव्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर जबरदस्त विजय मिळवला आहे. पाकिस्तानने