Jalgaon Accident : मतदानाची ड्युटी शेवटची ठरली! इलेक्शन कामातून परतताना शिक्षकाचा मृत्यू

जळगाव : काल राज्यभरात विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) मतदान (Voting) पार पडले. अशावेळी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षक इलेक्शन ड्यूटीमध्ये (Election Duty) व्यस्त असतात. मात्र त्याचदरम्यान जळगाव जिल्ह्यात (Jalgaon) एक दुर्दैवी घटना घडली आहे. जळगाव जिल्ह्यात मतदान कर्तव्यावर असलेल्या एका शिक्षकाचा इलेक्शन ड्यूटीहून परतताना भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला असून परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत वासुदेव पाटील (४९) उपशिक्षक अनवर्दे बुधगांव हे इलेक्शन ड्यूटीवरुन त्यांच्या बभळाज तालुका शिरपूर मूळगावी जात होते. मात्र यादरम्यान सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. घटनेनंतर स्थानिकांनी त्यांना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


दरम्यान, लक्ष्मीकांत पाटील यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून घटनेची माहिती मिळताच जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

Mumbai-Goa National Highway : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; पाच जण गंभीर

Mumbai-Goa National Highway accident : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर भरणेनाका येथे शनिवारी सकाळी भीषण अपघाताची घटना घडली आहे. या

Eknath Shinde : मोदींचा करिष्मा अन् अमित शहांची चाणक्यनीती यशस्वी

पश्चिम बंगालमध्ये जनतेने विकासाला दिला कौल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुवेंदू अधिकारी यांचे

SSC Result 2026 Marathi : दहावीच्या निकालातील धक्कादायक वास्तव : 'मायमराठी'तच राज्यातील ८० हजारांहून अधिक विद्यार्थी नापास!

एका बाजूला महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्यावरून राजकीय आणि सामाजिक पातळीवर

Satara Accident : नवा संसार थाटण्यापूर्वीच काळाचा घाला; ट्रक ५० फूट दरीत कोसळून चिमुकल्यासह चौघांचा करुण अंत

सातारा : सातारा जिल्ह्यातील कासरतळे (Kaasratale) परिसरात एका अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची नोंद झाली आहे. येथे

नाशिकच्या ‘कॉर्पोरेट जिहाद’नंतर राज्य सरकार अलर्ट मोडवर

‘पॉश’ कायद्याची अंमलबजावणी अनिवार्य; कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पावले मुंबई : नाशिक येथील

Defamation on social media :सोशल मीडियावर बदनामी करणे महागात पडणार, कायद्यात बदल करण्यासाठी राज्य सरकारकडून उच्चस्तरीय समितीची स्थापना

मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social media platforms) वापर करून पुराव्यांविना केली जाणारी बदनामी (Defamation) आणि त्यातून