Bitcoin : बिटकॉईन प्रकरण, ईडीने छत्तीसगडमध्ये टाकले छापे

vv राज्यातील विधानसभा निवडणुकीत बिटकॉईनचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या निवडणुकीदरम्यान बिटकॉईनचा वापर झाल्याचा आरोप केला जात आहे. या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी छत्तीसगडमध्ये छापा टाकला.


आदल्याच दिवशी भाजपाकडून सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्यावर आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही कारवाई करण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागाकडूनही बिटकॉईन घोटाळाप्रकरणी गौरव मेहताला समन्स बजावण्यात आले आहेत. मेहताला लवकरात लवकर चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश सीबीआयकडून देण्यात आलेत.


मंगळवारी भाजपने खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात बिटकॉईन वापराचे आरोप केले. यावेळी त्यांनी ध्वनीफितही जारी केली. भाजपचे खासदार तसेच प्रवक्ते सुंधाशू त्रिवेदी यांनी मंगळवारी रात्री ही पत्रकार परिषद घेतली होती. यादरम्यान हे आरोप करण्यात आले.


तसेच त्यांनी पुरावे म्हणून कॉल रेकॉर्ड्स आणि व्हॉट्सअॅप चॅटचे स्क्रीनशॉटही सादर केले. भाजपने मंगळवारी पत्रकार परिषद घेत पटोले आणि सुळे यांच्यावर आरोपबाजी केली. सुप्रिया सुळे आणि पटोले यांनी परकीय चलनाचा वापर करत मतदानावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचेही म्हणाले.

Comments
Add Comment

दसऱ्याच्या मुहूर्तावर दोन मेट्रो मार्गिका सुरू होण्याची शक्यता

मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची चर्चा असतानाच

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.