Winter : राज्यात थंडीचा कडाका वाढला, निफाडमध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद

मुंबई: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण जरी गरम असले तरी थंडीची लाट(Winter )चांगलीच पसरली आहे. राज्यात थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात थंडीने जोर धरला असून, निफाडमध्ये राज्यातील सर्वात कमी ११ अंश तापमानाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागानुसार पुढील २४ तासांत तापमानात अधिक घट होण्याची शक्यता आहे.


मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सूर्य मावळल्यानंतर थंडीचा कडाका अधिक तीव्र होत असून शेकोट्या पेटवण्यास सुरुवात झाली आहे. पुणे, पश्चिम महाराष्ट्र, आणि कोकणातील घाट क्षेत्रांत पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहील, तर काही ठिकाणी धुक्याची शक्यता आहे. मुंबईत मात्र फारसा गारठा जाणवणार नसल्याने तापमान स्थिर राहील. देशाच्या उत्तरेकडून हिमालयीन पर्वतरांगेवरून वाहणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यातील थंडी वाढली आहे.


तामिळनाडूपर्यंत पोहोचलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे दक्षिण भारतातही थंडीचा(Winter) प्रभाव जाणवत आहे. राज्यातील गारठा विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरही परिणाम करू शकतो. सकाळी थंडी जाणवणार असल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांची तयारी ठेवावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला