BloodBank : राज्यात रक्ताचा तुटवडा; चार दिवस पुरेल इतकाच साठा

मुंबई : एकापाठोपाठ आलेल्या सणांच्या सुट्ट्या आणि विधानसभा निवडणूक यामुळे राज्यामध्ये रक्तदान शिबिरांचे आयोजन कमी झाले आहे. परिणामी, राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून, मुंबईसह राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. ही परिस्थिती लक्षात घेत राज्य रक्त संक्रमण परिषदेने ३१ जानेवारी २०२५ पर्यंत परराज्यात रक्त हस्तांतरणावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.


त्यामुळे राज्यातील रक्तपेढ्यांनी परराज्यातील रक्तपेढ्यांना रक्त विक्री केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. रक्तपेढ्यांकडून रक्त मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी रुग्णांच्या नातेवाईकांनी राज्य रक्त संक्रमण परिषदेकडे केल्या आहेत.



राज्यात मोठी आपत्ती घडल्यास रक्त तुटवडा प्रकर्षाने जाणवू शकतो. असे असतानाही राज्यातील काही रक्तपेढ्या त्यांच्याकडील अतिरिक्त रक्त व रक्त घटक यांची मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री करीत आहेत. ही बाब लक्षात घेत रक्तपेढ्यांनी राज्यातील रक्ताच्या गरजेला प्राधान्य द्यावे. अशी भूमिका राज्य रक्त संक्रमण परिषदेने घेतली आहे.


या सूचनांचे काटेकोरपणे पालन न करणाऱ्या रक्तपेढ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे राज्य रक्त संक्रमण परिषदेचे संचालक डॉ. स्वप्निल लाळे यांनी सांगितले. रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी गृहनिर्माण संस्था संकुलामध्येही शिबिरांचे आयोजन करावे, अशा सूचना रक्तपेढ्यांना देण्यात आल्या आहेत.

Comments
Add Comment

Ashish Shekar : महानगरपालिका रुग्णालयातील ओपीडी आणि स्वच्छतागृहांचे सध्याचे चित्र तातडीने सुधारा

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांचे सार्वजनिक आरोग्य आढावा बैठकीत निर्देश मुंबई (विशेष

Geomagnetic storm : पृथ्वीवर भूचुंबकीय वादळ धडकणार, नासाचा इशारा ; भारतातही ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता

मुंबई : सूर्यावरील एका शक्तिशाली उद्रेकामुळे पृथ्वीच्या दिशेने प्रचंड प्रमाणात चुंबकीय ऊर्जा आणि प्लाझ्माचा

Adani Airport : मुख्यमंत्री कार्यालयाकडून सिडको आणि 'अदानी एअरपोर्ट' प्रशासनाला नोटीस

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांना कार्यक्रमाचे निमंत्रण न पाठवल्याने राजशिष्टाचाराचा

High Court : सामान्य प्रशासन विभागाच्या सचिवांना अवमान नोटीस

उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीत चालढकल; तात्पुरत्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा होऊनही आदेश रखडले मुंबई :

Aarey Colony : आरे वसाहतीतील झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रस्ताव अखेर रद्द

राज्य शासनाने जागा घेतली ताब्यात; ३३.६ एकर जमिनीबाबत २० वर्षांपूर्वी झाला होता निर्णय मुंबई : आरे दुग्ध

Sagar Mitra : किनारपट्टीवरील ९१ अति संवेदनशील लँडिंग पॉईंटवर ‘सागर मित्र’ नेमणार

मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा; मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध प्रकल्पांना मिळणार गती मुंबई :