Rich Actress: १० हजार साड्या, २८ किलो सोने, ऐश्वर्या, जुही नव्हे तर ही होती देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री

मुंबई: भारतीय सिने इंडस्ट्रीमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी(Rich Actress) बोलायचे झाल्यास तर अनेक नावे समोर येतात. मात्र तुम्हाला माहीत आहे का की इंडियन सिनेमामधील सर्वात श्रीमंत अभिनेत्री कोण आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत याचे उत्तर मिळाले आहे. ४६०० कोटींच्या संपत्तीसह जुही चावला श्रीमंत अभिनेत्री बनली आहे. मात्र इतिहासामध्ये अशीही एक अभिनेत्री होती जी जुही चावलापेक्षा कितीतरी पटीने श्रीमंत होती.


१० हजारापेक्षा अधिक महागड्या साड्या, २८ किलोंपेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि एकापेक्षा एक महाग चपला, सँडल्स. हे सगळं ऐकल्यावर एखाद्या राजकुमारी अथवा महाराणीचा वॉर्डरोब आहे असे वाटते. मात्र हे सर्व एका भारतीय सिने इंडस्ट्रीतील अभिनेत्रीकडे होते. आम्ही बोलत आहोत तामिळ आणि तेलुगु सिनेमातील अभिनेत्री जयललिताबद्दल.


वयाच्या १५व्या वर्षापासून अभिनेत्रीने आपल्या करिअरला सुरूवात केली. तिने आपल्या कारकि‍र्दीत अनेक हिट सिनेमे दिले. जयललिता या सुपरस्टार एमजीआर यांना आपले गुरू मानत होत्या. एकट्या एमजीआर यांच्यासोबत जयललिता यांनी २८ सिनेमांमध्ये काम केले होते.


जयललिता यांनी सिने इंडस्ट्रीमधून बक्कळ पैसा कमावला होता. मात्र त्यांची खरी संपत्ती राजकारणात एंट्री झाल्यानंतर मिळाली. एकदा जयललिता यांच्या घरी सीबीआयचा छापा पडला होता. या छापेमारीत जयललिता यांच्या घरातून जे निघाले होते ते पाहून सारेच आश्चर्यचकित झाले होते.


सीबीआयच्या छापेमारीत जयललिता यांच्या घरातून २८ किलो सोने, १० हजाराहून अधिक महागड्या साड्या आणि ७५० जोडी महागड्या चपला जप्त करण्यात आल्या होत्या. १९९७मध्ये हा छापा टाकण्यात आला होता. यानंतर जयललिता यांच्यावर आरोप होते की त्यांनी आपली संपत्ती १९९ कोटी रूपये दाखवली होती. मात्र त्यावेळेस त्यांची संपत्ती ९०० कोटी रूपयांपेक्षा अधिक होती. ही संपत्ती आजच्या हिशेबाने पाहिल्यास ५ हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक आहे.

Comments
Add Comment

‘द केरळ स्टोरी’ फेम अदाला मोठा धक्का; लाडक्या आजीचे निधन, महिनाभर सुरू होते उपचार

मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री अदा शर्मा सध्या वैयक्तिक आयुष्यात मोठ्या दुःखातून जात आहे. ‘द केरळ स्टोरी’मुळे

अभिनेत्री श्रद्धा कपूर शूटिंगदरम्यान जखमी

मुंबई  : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या चाहत्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार,

रिंकू राजगुरुच्या 'आशा' सिनेमाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : सैराट फेम रिंकू राजगुरू तिच्या नवीन चित्रपटातून 'आशा' च्या माध्यमातून भेटीला येत आहे. याआधीही तिने

निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जीवनगौरव पुरस्कार

जागतिक मराठी संमेलन गोव्यात ; ९ जानेवारीला देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन ; महेश मांजरेकर यांना जीवनगौरव

जुन्या चित्रपटांचे वैभव प्रेक्षक पुन्हा अनुभवणार

वंचितांचं जगणं आणि त्यात आत्मजाणिवेनं होणारं परिवर्तन यांची हृदयस्पर्शी आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी

‘बोल बोल राणी, इता इता आणी’ या शॉर्ट फिल्मचे स्क्रीनिंग

बालदिनाच्या पूर्वसंध्येला ऑल प्ले प्रोडक्शन्सतर्फे त्यांच्या पहिल्या शॉर्ट फिल्मची “बोल बोल राणी, इता इता