CBSC Syllabus : दहावी-बारावीचा अभ्यासक्रम १५ टक्क्यांनी कमी!

सीबीएसई बोर्ड परीक्षेचे डेटशीट लवकरच


पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSC) दहावी-बारावीचा अभ्यासक्रम १५ टक्क्यांनी कमी केला आहे. याशिवाय परीक्षा पद्धतीतही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार ४० टक्के गुण अंतर्गत मूल्यांकनासाठी आणि उर्वरित ६० टक्के गुण अंतिम परीक्षेसाठी दिले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या ओझ्यातून वाचवून विषय सखोलपणे समजून घेण्याची संधी देणे, हा यापाठीमागचा उद्देश आहे. अभ्यासक्रमातील कपात हा मंडळाच्या विकसित शैक्षणिक रच- नेशी सुसंगत आहे. २०२५ च्या सीबीएसई परीक्षेचा पॅटर्नही बदलण्यात आला आहे. त्यानुसार दहावी-बारावीच्या दोन्ही वर्गासाठी अंतर्गत मूल्यांकनासाठी ४० टक्के गुण निश्चित करण्यात आले आहेत, तर उर्वरित ६० टक्के गुण अंतिम लेखी परीक्षेवर आधारित असतील. बोर्डाच्या यंदाच्या परीक्षा मंडळाकडून लवकरच दहावी - बारावीसाठी डेटशीट प्रसिद्ध करण्यात येईल.



मागील वर्षांचा पॅटर्न लक्षात घेता, पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्ये डेटशीट रिलीज होईल, अशी अपेक्षा आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी ते अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतील. तसेच १५ फेब्रुवारी २०२५ पासून बोर्डाच्या परीक्षा होणार असल्याचे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे.



दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्याची तयारी


पुढील वर्षी दोन टर्ममध्ये परीक्षा घेण्याची तयारी सुरू आहे. या बदलाला अंतिम स्वरूप देण्यात आले असून, लॉजिस्टिकची तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दोन टर्म परीक्षा मॉडेलचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना अधिक वारंवार मूल्यांकनाच्या संधी उपलब्ध करून देणे आहे.

Comments
Add Comment

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डॉक्टर तरुणी आणि प्रशांत बनकरमध्ये काय घडलं ?

सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालय येथे कार्यरत डॉक्टर तरुणीने एका हॉटेलच्या रुममध्ये आत्महत्या केली. या प्रकरणात

Nanded Mumbai Flight : प्रतीक्षा संपली! नांदेड-मुंबई, गोवा विमानसेवेचा 'मुहूर्त' ठरला, मुंबई, गोव्याचा प्रवास तासाभरात; पहिलं उड्डाण कधी?

नांदेड : नांदेडमधील प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित नांदेड-मुंबई (Nanded-Mumbai) आणि नांदेड-गोवा

राज्यातील 'या' पाच समुद्रकिनाऱ्यांना मिळणार 'ब्लू फ्लॅग'? नामांकनासाठी किनाऱ्यांचे सुरक्षा ऑडीट होणार लवकरच पूर्ण

महाराष्ट्र: राज्यातील पाच समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावरील 'ब्ल्यू फ्लॅग'साठी प्रायोगिक तत्त्वावर

कल्याण-डोंबिवलीला फटाक्यांच्या आतषबाजीमुळे प्रदूषणाचा विळखा

केडीएमसीतील नागरिक श्वसनाच्या आजाराने त्रस्त कल्याण (प्रतिनिधी) : नुकताच दिवाळी सण सर्वत्र मोठ्या उत्साहात

परतीच्या पावसाने भातपिके उद्ध्वस्त, बळीराजा आर्थिक अडचणीत

रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले

मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्याचा तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला: पोलिसांनी घेतले ताब्यात

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे एका संतप्त शेतकऱ्याने तहसीलदारांच्या वाहनाची काच फोडल्याची घटना घडली,