UP Accident : लग्नाची मिरवणूक जीवावर बेतली! अपघातात वधू-वरासह ७ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील (UP Accident) बिजनौर येथे झालेल्या भीषण अपघातात वधू-वरासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नानंतर लग्नाची मिरवणूक (Marriage Function) वधूसोबत परतत असताना हा भीषण अपघात घडला. यानंतर सर्व परिसरातून हळहळ व्यक्त होत असताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये लग्न आटोपून संपूर्ण कुटुंब ऑटोने बिजनौर येथील आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला. धामापूर पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कार आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला. टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या वधू-वर आणि कुटुंबातील सहा सदस्यांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान टेम्पो चालकाचाही मृत्यू झाला.



मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली दखल


बिजनौर जिल्ह्यातील रस्ते अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातामधील इतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Vedanta plant in Chhattisgarh : छत्तीसगड : वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलरचा भीषण स्फोट; १४ कामगारांचा मृत्यू, १९ गंभीर जखमी

छत्तीसगड : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील सिंहितराई स्थित वेदांता

ECOSOC India Elected : संयुक्त राष्ट्रसंघात भारताचा दबदबा! तीन जागतिक समित्यांमध्ये भारताची निवड

- २०२७-३० साठी मोठं राजनैतिक यश मुंबई : २ एप्रिल २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या इकोनॉमिक अँड सोशल कॉन्सिल कॉनशील

PM Modi - Trump Phone Call : पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवर चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात मंगळवार १३ एप्रिल रोजी सुमारे ४० मिनिटे दूरध्वनीवर चर्चा

Chhattisgarh : वीज प्रकल्पात बॉयलरचा स्फोट, अनेकांचा मृत्यू

शक्ती : छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात वेदांता कंपनीच्या वीज निर्मिती प्रकल्पात बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटात नऊ

पर्यावरणप्रेमी की पर्यावरणाला हानीकारक आहे EV ?

नवी दिल्ली : दिल्ली सरकारने ‘ईव्ही धोरण २.०’ अंतर्गत विद्युत वाहनांना प्रदूषणाविरुद्ध प्रभावी पर्याय म्हणून

Samrat Choudhary : बिहारमध्ये 'सम्राट' पर्व सुरू; उद्या सम्राट चौधरी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

पाटणा : बिहारच्या राजकारणात आज एक मोठी ऐतिहासिक घडामोड घडली आहे. सुमारे दोन दशके मुख्यमंत्रिपद भूषवल्यानंतर