UP Accident : लग्नाची मिरवणूक जीवावर बेतली! अपघातात वधू-वरासह ७ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशातील (UP Accident) बिजनौर येथे झालेल्या भीषण अपघातात वधू-वरासह सात जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नानंतर लग्नाची मिरवणूक (Marriage Function) वधूसोबत परतत असताना हा भीषण अपघात घडला. यानंतर सर्व परिसरातून हळहळ व्यक्त होत असताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये लग्न आटोपून संपूर्ण कुटुंब ऑटोने बिजनौर येथील आपल्या घरी परतत असताना हा अपघात झाला. धामापूर पोलीस ठाणे हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर कार आणि टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत टेम्पो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पडला. टेम्पोमध्ये प्रवास करणाऱ्या वधू-वर आणि कुटुंबातील सहा सदस्यांचाही जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान टेम्पो चालकाचाही मृत्यू झाला.



मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली दखल


बिजनौर जिल्ह्यातील रस्ते अपघाताची मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दखल घेतली आहे. मुख्यमंत्री योगी यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. तसेच अपघातामधील इतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Comments
Add Comment

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’चा अपमान करणे आता गंभीर गुन्हा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, कायद्यात दुरुस्ती

नवी दिल्ली : देशभक्तीशी निगडित प्रतीकांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ‘वंदे

Supreme Court News : सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांची संख्या वाढणार; केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशातील न्यायव्यवस्था अधिक सक्षम आणि जलद करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचललं आहे.

Scooter Blast Near BSF Headquarters : BSF मुख्यालयाजवळ स्कूटरचा स्फोट; जालंधरमध्ये खळबळ, सर्व बाजूंनी तपास सुरू

पंजाब : पंजाबमधील जालंधर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) मुख्यालयाजवळ अचानक स्कूटरचा स्फोट झाल्याची धक्कादायक

Bharat Electronics Limited : संरक्षण मंत्रालयाचा भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड सोबत 1476 कोटींचा करार

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्करासाठी किमान पाच ग्राउंड-बेस्ड मोबाईल इलेक्ट्रॉनिक सिस्टीमच्या

Narendra Modi : युएईच्या तेलक्षेत्रावरील इराणच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींकडून तीव्र शब्दांत निषेध

नवी दिल्ली : इराणकडून संयुक्त अरब अमिराती (यूएई)च्या फुजैराह तेल औद्योगिक क्षेत्रावर झालेल्या हल्ल्यात तीन

'आयुष्मान भारत' ८ वर्षानंतर राष्ट्रीय होणार, लवकरच 'या' राज्यांमध्ये 'आयुष्मान भारत' लागू होणार

पश्चिम बंगालमधील ऐतिहासिक विजयानंतर, भारतीय जनता पक्ष केवळ राज्यात नेतृत्व निवडीच्या प्रक्रियेतच गुंतलेला