Delhi Pollution : प्रदूषणाचा कहर! दिल्लीत सहावी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये (Delhi) गेल्या अनेक दिवसांपासून प्रदूषणाचा (Pollution) गंभीर धोका निर्माण झाला आहे. आज सकाळीही दिल्लीत प्रदूषणाची अत्यंत धोकादायक पातळी नोंदवली गेली. सकाळी ७ वाजता दिल्लीतील १० हून अधिक स्थानकांवर हवा गुणवत्ता निर्देशांकाची ४००+ नोंद झाली. जहांगीरपुरीमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांकाने ४४५ ची सर्वोच्च पातळी गाठली. सध्या दिल्लीतील सामाईक हवा गुणवत्ता निर्देशांक ४३६ गंभीर स्थितीत आहे.


राष्ट्रीय राजधानी दिल्लीत दरवर्षीच्या हिवाळ्यात तेवढ्याच नेमेची येणाऱ्या प्रदूषणाने या आठवड्यात कळस गाठला आहे. धूर आणि धुक्याचे मिश्रण असलेल्या विषारी धुरक्याचा पडदा शनिवारी सलग पाचव्या दिवशी साऱ्या दिल्लीला वेढून राहिल्याने डोळे जळजळणे, खोकला, शिंका येणे, सर्दी, उलट्या, श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे या समस्यांनी दिल्लीकरांना, त्यातही लहान मुलांना हैराण केले.



प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अतिशी (Atishi Marlena) यांनी सरकारी कार्यालयांच्या नव्या वेळा जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकारची कार्यालये सकाळी ९ ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत, दिल्ली सरकारी कार्यालये सकाळी १०ते सायंकाळी ६.३० आणि एमसीडी कार्यालये सकाळी ८.३० ते सायंकाळी ५ या वेळेत काम करतील, असे त्यांनी म्हटले आहे.



विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य


दिल्लीतील सर्व प्राथमिक (इयत्ता पाचवीपर्यंत) शाळांमध्ये ऑनलाइन वर्ग सुरू करण्याची घोषणा शुक्रवारीच करण्यात आली होती. आता दिल्लीतील सहावी ते बारावीपर्यंतच्या शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांना मास्क अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात दिल्ली सरकारकडून घेण्यात आला आहे.



सरकारकडून खाजगी वाहने न चालवण्याचे आवाहन


सरकारने (Delhi Government) लोकांना खाजगी वाहने न चालवण्याचे आवाहन केले आहे. यासाठी १०६ अतिरिक्त क्लस्टर बस आणि मेट्रोच्या ६० ट्रिप वाढवण्यात आल्या आहेत, जेणेकरून लोक खाजगी वाहनांचा कमी वापर करतील. एअर कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटनेदेखील एनसीआरमधून येणाऱ्या बसेसला म्हणजेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून दिल्लीला येण्यास बंदी घातली आहे. आगामी किमान आठवडाभर तरी धुरके आणि प्रदूषणाचा दुहेरी फटका दिल्लीकरांना सहन करावा लागू शकतो.



ग्रेप-३ नियमांमुळे पुढील निर्बंध



  • बांधकाम करणे आणि पाडणे थांबवले जाईल, सर्व अनावश्यक खाणी बंद राहतील.

  • बिगर-इलेक्ट्रिक, बिगर-सीएनजी आणि बिगर-बीएस-५ डिझेल आंतरराज्यीय बसेसवर बंदी असेल.

  • प्रमुख रस्त्यांवर पाणी शिंपडणारी वाहने वाढवण्याचा निर्णय.

Comments
Add Comment

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च

पाचगणी ते महाबळेश्वर, युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत भारताची ७ ठिकाणे झळकली!

महाराष्ट्राचा डंका! नवी दिल्ली : देशातील ७ सुंदर ऐतिहासिक स्थळांची नावे युनेस्कोच्या संभाव्य जागतिक वारसा