Solapur: सोलापूर विद्यापीठालाही २० नोव्हेंबरला सुट्टी

सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला सुटी राहील, असे प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. याशिवाय संलग्नित उच्च महाविद्यालयांनाही त्या दिवशी सुटी असणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबरपासून विद्यापीठाची सत्र परीक्षा सुरु होणार आहे. विद्यापीठाला सुटी देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बंधनकारक असतात, पण तसे आदेश नसल्याने केवळ २० नोव्हेंबरलाच विद्यापीठ व संलग्नित उच्च महाविद्यालयांनाही सुट्टी असणार आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला (बुधवारी) जिल्ह्यातील तीन हजार ७२३ केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३५९ शाळांमध्ये अडीच हजार मतदान केंद्रे आहेत. दुसरीकडे बहुतेक शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी असल्याने १९ व २० नोव्हेंबरला जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी प्राथमिक शाळांना सुटी असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांसाठी तसे आदेश काढले आहेत.विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरविणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित खासगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी १९ व २० नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांच्या स्तरावर घ्यावा, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. तर जिल्हा परिषदेच्या शाळांसाठीही हा निर्णय लागू असणार आहे.



पण, ज्या शाळांमधील शिक्षकांना विशेषत: दिव्यांग किंवा ५३ वर्षांवरील शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी आलेली नाही आणि त्या शाळेत मतदान केंद्र देखील नाही, अशा शाळा सुरु ठेवता येतील, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी १७ नोव्हेंबरला शाळांना सुटी असणार आहे आणि त्यानंतर मंगळवार व बुधवारी देखील मतदानामुळे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतेकजण सोमवारी एक दिवस शाळेत येण्यापेक्षा रजाच घेतील, अशी शक्यता आहे.

Comments
Add Comment

Nitin Gadkari : पुणे-संभाजीनगर प्रवास दोन तासांत; मुंबई-बेंगळुरू अंतर पाच तासांत

पुणे : पुणे ते संभाजीनगर प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी नवीन उन्नत मार्ग उभारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे हे

Governor Jishnu Dev Verma : विद्यापीठांनी शिक्षणासह कौशल्यांचे एकत्रिकरण करणे आवश्यक - राज्यपाल जिष्णु देव वर्मा

पुणे : कृत्रिम बुद्धीमत्ता, डेटा सायन्स, रोबोटिक्स, क्वांटम तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि स्वच्छ

Navneet Rana : अमरावतीतील हनुमान गढीवर राणा दांपत्याचे हनुमान चालीसा पठण; उद्धव ठाकरेंना दिले खुले निमंत्रण

ठाकरेंनी अमरावतीत येऊन हनुमान चालीसा वाचावी; राणा दांपत्याचे थेट आव्हान अमरावती : उबाठा यांच्या रामरक्षा

Government Scheme: देशातील टॉप कॉलेजमध्ये शिकायचं आहे ? पण पैश्यांमुळे काळजी करताय तर काळजी करू नका, आता खर्च सरकार उचलणार ; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घ्य

Maharashtra Corona Alert : कोरोनाची पुन्हा चाहूल? महाराष्ट्रात ४८ रुग्णांची नोंद; आरोग्य विभागाने दिला महत्त्वाचा इशारा

मुंबई : कोरोना महामारीच्या आठवणी अजून ताज्या असतानाच पुन्हा एकदा कोविड-१९च्या रुग्णसंख्येबाबत चिंता वाढवणारी

Dhule Accident : परतीचा प्रवास अर्ध्यावरच ! नाशिकच्या कुटुंबाचा धुळ्यात भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू , ५ गंभीर

Dhule Mumbai Agra Highway accident : नाशिकच्या एका कुटुंबाचा परतीचा प्रवास अपूर्णच राहिल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अजमेर येथे