LadKi Bahin Yojana : अखेर प्रतीक्षा समाप्त; लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार? सर्वात मोठी अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात राज्य सरकारनं गरजू महिलांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशानं लाडकी बहीण योजना सुरू केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत दिवाळीआधी राज्य सरकारने चौथा आणि पाचवा हप्ता महिलांच्या खात्यात जमा केला होता. त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी गोड झाली होती. राज्य सरकारची ही एक महत्त्वकाक्षी योजना आहे. मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या ही योजना प्रचाराचा मुख्य मुद्दा बनली असून, या योजनेवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. असं असतानाच आता राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळणार आहे.


या योजनेंतर्गत जुलैपासून महिलांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरूवात झाली. निवडणूक आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे ऍडव्हान्स पैसे महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. मात्र आता सर्वांनाच प्रतिक्षा आहे ती म्हणजे लाडक्या बहिणीचा डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार.



महायुती सरकारवर एकीकडे या योजनेवरून विरोधकांनी टीकेची लाट पसरवली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू करून महिलांचं मत खरेदी करण्याचा प्रयत्न होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे विरोधकांना सत्ताधाऱ्यांकडून देखील तोडीस तोड उत्तर दिलं जात आहे. आता या योजनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वात मोठी माहिती दिली आहे.



नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?


मतदान पार पडल्यांनंतर लाडक्या बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता खात्यात जमा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीमध्ये असताना म्हटलं आहे. पुढे बोलताना या योजनेवरून त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे मला म्हणाले की, दहा दिवस थांबा की तुम्हाला पण जेलमध्ये टाकतो, लाडकी बहीण आणली म्हणून हा राग आहे का? सावत्र भावांना तुम्ही निवडणुकीत जोडा दाखवा, मविआच्या पायाखालची वाळू सरकली आहे . विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम आम्ही करू, आमची नियत साफ आहे, हे सरकार देना बँक आहे घेना बँक नाही, निवडणूक झाल्यानंतर डिसेंबरचा हफ्ता खात्यामध्ये जमा होणार आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.




Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

वांद्रे किल्ला परिसरात दारू पार्टी, दोषींवर नियमानुसार होणार कारवाई

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात किल्ल्यांना महत्त्व आहे. पण धमालमस्ती करताना

उमेदवारीचा पत्ता नाही, पण सोशल मीडियावर प्रचाराची धावपळ सुरू

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जानेवारीत जाहीर होण्याची शक्यता असून आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे.

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड

मुलुंड पूर्व आणि पश्चिममधील नाने पाडा नाल्यावरील पुलांची पुनर्बांधणी

मुंबई : पूर्व उपनगरातील मुलुंड पश्चिममधील नानेपाडा नाल्यावरील पूल पाडून त्याठिकाणी नव्याने पुनर्विकास केला