IND vs AUS: शुभमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, टीम इंडियात या खेळाडूला मिळू शकते संधी

मुंबई: शुभमन गिलच्या दुखापतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. दरम्यान, त्याची दुखापत खूप गंभर आहे. गिलचे पर्थ कसोटीतून बाहेर होणे निश्चित आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळवला जात आहे. गिलच्या अनुपस्थितीत टीम इंडिया अभिमन्यू ईश्वरनला संधी देऊ शकते.


खरंतर शुभमन गिल पर्थ कसोटीच्या आधी सराव करत होता. त्याच्यासोबत टीम इंडियाचा दुसरा खेळाडूही उपस्थित होता. गिल शनिवारी एक कॅच घेत असताना दुखापतग्रस्त झाला. यानंतर तो मैदानाबाहेर गेला आणि परत आला नाही. शुभमनला स्कॅनिंगसाठी हॉस्पिटलला नेण्यात आले. मिडिया रिपोर्टनुसार गिलचा अंगठा फ्रॅक्चर झाला आहे. त्याचे पर्थ कसोटीतून बाहेर जाणे निश्चित आहे.



गिलच्या अनुपस्थितीत अभिमन्यूला पदार्पणाची संधी


टीम इंडियासाठी शुभमन गिल तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करतो. जर तो पर्थ कसोटीसाठी फिट झाला नाही तर अभिमन्यू ईश्वरनला पदार्पणाची संधी मिळू शकेत. तो सध्या ऑस्ट्रेलियातच आहे आणि इंडिया टीम एचा भाग आहे. अभिमन्यूची घरच्या मैदानावरील कामगिरी चांगली आहे. मात्र अद्याप त्याला टीम इंडियासाठी खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याने १०१ फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ७६७४ धावा केल्या आहेत.

Comments
Add Comment

टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत बुमराहची १० स्थानांची झेप

मुंबई : टी-२० गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने १० स्थानांची झेप घेतली आहे.

खेळाडूंच्या सुरक्षेसाठी प्रेक्षकांनाच सामना पाहण्यास बंदी!

विराट कोहली १५ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार नवी दिल्ली : येत्या २४ डिसेंबरपासून देशातील सर्वात मोठ्या

बीसीसीआयच्या निर्णयामुळे महिला क्रिकेट खेळाडूही होणार मालामाल

देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने महिला

मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्सकडे दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीने भारतीय संघाला आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२५ ट्रॉफी जिंकून देण्यात प्रमुख

श्रीलंकेविरुद्धच्या टी ट्वेंटी मालिकेत भारताचा सलग दुसरा विजय

विशाखापट्टणम : भारत आणि श्रीलंका यांच्यात पाच सामन्यांची टी ट्वेंटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील सलग दोन सामने

बुधवारपासून रंगणार विजय हजारे ट्रॉफीचा थरार; बीसीसीआयच्या नियमामुळे स्टार क्रिकेटपटूही मैदानात

मुंबई : विजय हजारे क्रिकेट स्पर्धेचा थरार उद्या म्हणजेच बुधवार २४ डिसेंबरपासून सुरू होत आहे. देशांतर्गत