Health : दररोज मूठभर खा हे ड्रायफ्रुट, नजरेचा चश्मा लावण्याची गरज नाही

मुंबई: जसजसे वय वाढते तसतसे नजर कमजोर होत जाते. मात्र आजकाल कमी वयातही डोळ्यांची नजर कमी होऊ लागली आहे. याचे एक मुख्य कारण शरीरातील पोषकतत्वांची कमतरता हे आहे.नजर कमकुवत होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. अनेकदा एखाद्या आजारामुळे डोळ्यांची नजर कमी होऊ लागे. अनेकदा डोळ्यांची नजर वाढवण्यासाठी गाजर खाण्याचा सल्ला दिला जातो.


गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी हे व्हिटामिन अतिशय फायदेशीर असते. मात्र तुम्हाला गाजर खाणे आवडत नसेल तर असे एक ड्रायफ्रुट आहे जे खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.


एका नव्या संशोधनानुसार असे समोर आले आहे की पिस्ता खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राखले जाते. पिस्तामध्ये ल्युटीन नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. डोळ्यांना निळ्या किरणांपासून होणाऱ्या नुकसानापासून बचावासाठी पिस्ता फायदेशीर आहे. ल्युटिन डोळ्यांच्या रेटिनासाठी फायदेशीर मानले जाते.



जर तुम्ही दररोज पिस्ताचे सेवन करत असाल तर यामुळे शरीरात ल्युटिनचा स्तर केवळ १२ आठवड्यांत दुप्पट होतो. पिस्तामध्ये ल्युटिनसोबत नॅचरल फॅट्सही आढळतात. यामुळे शरीरात शोषले जाते. दररोज ५० ग्रॅम पिस्ता खाल्ल्याने तुम्हाला शरीरात बदल दिसतील.


टीप - वर लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. प्रहार याची पुष्टी करत नाही. कोणताही सल्ला अमलात आणण्याआधी तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.

Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि