Hydrogen Train : आता विजेऐवजी थेट ‘हायड्रोजन' वर धावणार रेल्वे

नवी दिल्ली : जगामध्ये रेल्वे नेटवर्क हे खूप मोठं नेटवर्क आहे. प्रवासासाठी लाखो लोक तिचा वापर करत असतात. भारतात पुढच्या महिन्यात, डिसेंबर २०२४ मध्ये दळणवळण क्षेत्रात क्रांती येणार आहे. भारतीय रेल्वेसुद्धा आपल्या गाड्या आणि डब्याचं आधुनिकीकरण करत आहे आणि प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन ट्रेन सुरू करत आहे. देशात रस्त्यांचे जाळे घट्ट आहेत. तर आता मोदी सरकारने रेल्वेचे जाळे पण दाट करण्यावर भर दिला आहे. पुढच्या महिन्यात हायड्रोजनवर चालणारी पहिली ट्रेन भारतीय रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. रेल्वे प्रवाशांसाठी पर्यावरणाला अनुकूलतेसोबतच आरामदायक असल्याचा दावा करण्यात येत आहे. डिझेल आणि वीजेशिवाय ही रेल्वे धावणार आहे. रेल्वेची गतीशीलता तर वाढेलच पण पर्यावरणवर जपण्यात मोलाचा हातभार लागेल. ही "पाण्यावर चालणारी" ट्रेन लवकरच रुळांवरून थिरकणार आहे. या आगामी हायड्रोजन ट्रेनचे मार्ग, वेग आणि वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्ये येथे आहेत.



भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारी ट्रेन


देशात पहिल्यांदाच रेल्वे पाण्यावर धावणार आहे. प्रगत हायड्रोजन इंधन तंत्रज्ञानाद्वारे हे साध्य केले जाईल. ही ट्रेन वीज तयार करण्यासाठी पाण्याचा प्राथमिक स्त्रोत म्हणून वापर करेल. लवकरच हायड्रोजन ट्रेनचा पायलट प्रोजेक्ट सुरू होणार आहे. या ट्रेनला प्रति तास सुमारे ४०,००० लिटर पाण्याची आवश्यकता असणार आहे आणि या ऑपरेशनला समर्थन देण्यासाठी विशेष पाणी साठवण सुविधा तयार केल्या जातील.यामुळे पार्यावरणाचं नुकसान होणार नाही



३५ हायड्रोजन ट्रेन सुरू करण्याची योजना


देशभरात भारतीय रेल्वेची हायड्रोजनवर चालणाऱ्या ३५ गाड्या तैनात करण्याची योजना आहे. संस्था आधीच हायड्रोजन इंधन सेल स्थापित करण्याच्या आणि पायाभूत सुविधांना आधार देण्याच्या प्रक्रियेत आहे. हायड्रोजन प्लांट्सच्या डिझाईन्सलाही मान्यता देण्यात आली आहे. रेल्वेचे प्रवक्ते दिलीप कुमार यांच्या मते, एका हायड्रोजन ट्रेनसाठी अंदाजे ८० कोटी रुपये खर्च येतो.






Comments
Add Comment

जयपूरमध्ये नाल्यात कार पडून सात जणांचा मृत्यू

जयपूर : जयपूरच्या शिवदासपुरा पोलीस स्टेशन परिसरातील प्रल्हादपुरा जवळ रिंग रोडच्या खाली असलेल्या पाण्याने

Earthquake : आसाममध्ये ५.८ तीव्रतेचा भूकंप

दिसपूर : आसाममधील गुवाहाटी येथे आज, रविवारी (१४ सप्टेंबर) भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले आहेत. संध्याकाळी ४:४१

बिहारमध्ये राजदने राहुल गांधींना बनवलं उल्लू

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. पण बिहारसाठी राजकीय पक्षांचा प्रचार हळू

पीएच. डी. शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू

लखनऊ (वृत्तसंस्था) : उत्तर प्रदेशातील प्रख्यात बनारस हिंदू विद्यापीठात शिकणाऱ्या २७ वर्षीय परदेशी

फटाकेबंदीबाबत देशव्यापी धोरण आखा

सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्ली-राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातच

वर्गमित्रांनीच ८ विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले फेविक्विक

भुवनेश्वर (वृत्तसंस्था) : ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातील फिरिंगिया ब्लॉकमधील सलागुडा येथील सेवाश्रम शाळेत सर्व