Railway Megablock : प्रवाशांचा खोळंबा! पुढील दोन दिवस पश्चिम रेल्वेवर १२ तासांचा मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) दर रविवारी यंत्रणा व झालेले तांत्रिक बिघाडाचे दुरुस्तीचे काम हाती घेतले जाते. त्यामुळे दर रविवारी रेल्वे मार्गावर काही काळासाठी मेगाब्लॉक (Railway Megablock) घेण्यात येतो. अशातच आता पश्चिम रेल्वेकडूनही (Western Railway) पुढील दोन दिवस मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवारी तब्बल १२ तासांचा मेगाब्लॉक आयोजित केला आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरी आणि गोरेगाव स्थानकादरम्यान एका पुलाच्या कामासंदर्भात हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवार १६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास ब्लॉकची सुरुवात होणार असून हा ब्लॉक रविवार १७ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. या कालावधीत प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या राम मंदिरवगळता अंधेरी आणि गोरेगाव/बोरिवली स्थानकांदरम्यान जलद मार्गावर चालवल्या जातील.



तसेच हार्बर रेल्वे मार्गावरही या ब्लॉकचा परिणाम होणार आहे. मध्य रेल्वेकडून (Central Railway) हार्बर मार्गावरील (Harbour Line) सर्व उपनगरीय सेवा आणि चर्चगेट ते गोरेगाव/बोरिवली दरम्यानच्या काही धीम्या सेवा अंधेरीपर्यंतच असतील. मेगाब्लॉक कालावधीत सर्व मेल व एक्स्प्रेस १० ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत. (Railway Megablock)

Comments
Add Comment

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री

मुंबईत दुपारी दीड वाजेपर्यंत २९.९६ टक्के मतदान

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान सुरू आहे.

मुंबईच्या इस्लामीकरणाचे षडयंत्र ‘टीस’च्या अहवालातून उघड

मुंबई  : २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदू लोकसंख्या केवळ ५४ टक्के उरेल, अशी धक्कादायक माहिती देशातील अग्रगण्य टाटा

BMC Election 2026 : बोटावरची शाई पुसून गैरकृत्य कराल तर सावधान! आयोगाने दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान 'बोटावरील शाई पुसली जात असल्याच्या' अफवा आणि