Gorai Murder Case : गोराईतील मृतदेहाच्या तुकड्यांमागील गूढ उकलले!

Share

मुंबई : चार दिवसांपूर्वी गोराई (Gorai) येथे एका माणसाचा मृतदेह सात तुकडे केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. (Murder Case) हात-पाय, धड, डोकं अशा अवयवांचे तुकडे करुन सात डब्यांमधून एका गोणीमध्ये भरुन झुडुपांमध्ये ही गोणी भिरकावण्यात आली होती. याप्रकरणी गोराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून या हत्येचे गूढ उकलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गोराई येथील मृत व्यक्तीचे नाव रघुनंदन पासवान असून त्याचे आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून ही हत्या झाली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. मृत रघुनंदन मूळचा बिहारचा रहिवासी असून पुण्यात मजुरी करतो. भाईंदरमधील एका अल्पवयीन मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. ते मुलीच्या कुटुंबाला मान्य नव्हते. त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.

दारू पाजून नशेत केली हत्या

रघुनंदन हा गेल्या आठ महिन्यांपासून पुण्याच्या एका कंपनीत काम करत होता. दिवाळीच्या सुट्टीत तो घरी गेला मात्र ३१ ऑक्टोबर रोजी तो मित्रांसोबत मुंबईला जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला. मुंबईला आल्यानंतर रघुनंदनने दारूच्या नशेत भाईंदरमध्ये राहणारा प्रेयसीचा भाऊ मोहम्मद सत्तार याला फोन केला. मोहम्मदने त्याला स्वतःकडे बोलावून दारू पाजली व नशेत त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडेकरुन हत्येच्या दुसऱ्या दिवशी ते तुकडे प्लास्टिकच्या डब्यात भरून तो डबा गोराईतील झुडुपात फेकून दिला.

दरम्यान, या गुन्ह्यात अटक आरोपीचा सहभाग असल्याचे तपासात समोर येत असून रिक्षाचालकाला याबाबत काही माहिती नसल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. (Mumbai Crime)

टॅटूमुळे पटली मृतदेहाची ओळख

मृत रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी मुलाच्या उजव्या हाताच्या टॅटूवरून त्याची ओळख पटवली. त्यावर ‘आरए अशी इंग्रजी अक्षरे लिहिली होती. रघुनंदनचे ज्या मुलीशी प्रेम होते, तिचे नाव ‘ए’ अक्षरावरून सुरू होते. (Gorai Murder Case)

Recent Posts

Viral News: ‘हे’ गाणे ऐकून लोक आत्महत्या करायचे; ६२ वर्षांनंतर बंदी हटवली!

मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…

40 minutes ago

Mumbai Airport Close : प्रवासी कृपया लक्ष द्या, मुंबईचा आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद राहणार आहे!

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…

45 minutes ago

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

1 hour ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

2 hours ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

2 hours ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

2 hours ago