Gorai Murder Case : गोराईतील मृतदेहाच्या तुकड्यांमागील गूढ उकलले!

मुंबई : चार दिवसांपूर्वी गोराई (Gorai) येथे एका माणसाचा मृतदेह सात तुकडे केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. (Murder Case) हात-पाय, धड, डोकं अशा अवयवांचे तुकडे करुन सात डब्यांमधून एका गोणीमध्ये भरुन झुडुपांमध्ये ही गोणी भिरकावण्यात आली होती. याप्रकरणी गोराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून या हत्येचे गूढ उकलले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गोराई येथील मृत व्यक्तीचे नाव रघुनंदन पासवान असून त्याचे आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून ही हत्या झाली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. मृत रघुनंदन मूळचा बिहारचा रहिवासी असून पुण्यात मजुरी करतो. भाईंदरमधील एका अल्पवयीन मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. ते मुलीच्या कुटुंबाला मान्य नव्हते. त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.



दारू पाजून नशेत केली हत्या


रघुनंदन हा गेल्या आठ महिन्यांपासून पुण्याच्या एका कंपनीत काम करत होता. दिवाळीच्या सुट्टीत तो घरी गेला मात्र ३१ ऑक्टोबर रोजी तो मित्रांसोबत मुंबईला जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला. मुंबईला आल्यानंतर रघुनंदनने दारूच्या नशेत भाईंदरमध्ये राहणारा प्रेयसीचा भाऊ मोहम्मद सत्तार याला फोन केला. मोहम्मदने त्याला स्वतःकडे बोलावून दारू पाजली व नशेत त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडेकरुन हत्येच्या दुसऱ्या दिवशी ते तुकडे प्लास्टिकच्या डब्यात भरून तो डबा गोराईतील झुडुपात फेकून दिला.


दरम्यान, या गुन्ह्यात अटक आरोपीचा सहभाग असल्याचे तपासात समोर येत असून रिक्षाचालकाला याबाबत काही माहिती नसल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. (Mumbai Crime)



टॅटूमुळे पटली मृतदेहाची ओळख


मृत रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी मुलाच्या उजव्या हाताच्या टॅटूवरून त्याची ओळख पटवली. त्यावर 'आरए अशी इंग्रजी अक्षरे लिहिली होती. रघुनंदनचे ज्या मुलीशी प्रेम होते, तिचे नाव 'ए' अक्षरावरून सुरू होते. (Gorai Murder Case)

Comments
Add Comment

बोरीवली स्थानकाला जोडणाऱ्या स्कायवॉकवर बसवणार सरकता जिना

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : बोरीवली रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या स्कायवॉकला आता सरकता जिना जोडला जाणार

विस्तारीत कोस्टल रोड प्रकल्पाच्या आड येणाऱ्या वर्सोव्यातील बांधकामांवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या वर्सोवा आराम नगर येथील ३३

नालेसफाई कंत्राटदारांची थकीत रक्कम देण्यास प्रशासन तयार, कंत्राटदार कामाला करणार सुरुवात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने छोट्या आणि मोठ्या नाल्यांच्या सफाईसाठी नियुक्त करण्यात

मुंबईत अत्यंत जबाबदारीने आणि प्रभावीपणे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन कार्यक्रम राबवावा; मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुंबई: महाराष्ट्रात लवकरच विशेष सखोल पुनरीक्षण (स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

वांद्रे पश्चिम भागांत शनिवारी, रविवारी पाणीकपात

मुंबई: पाली हिल जलाशयाच्‍या पाणी पातळीत सुधारणा करण्‍यासाठी वांद्रे पश्चिम येथील रामदास नायक मार्ग, स्‍वामी

मुंबईत वर्षभरात ५५ हजार ३९० क्षयरोग रुग्णांची नोंद

मुंबई: मुंबईत महापालिका सार्वजनिक आरोग्य विभागाकडून क्षय रूग्णांसाठी उच्च दर्जाच्या निदान सेवा, नवीन औषधोपचार