Gorai Murder Case : गोराईतील मृतदेहाच्या तुकड्यांमागील गूढ उकलले!

मुंबई : चार दिवसांपूर्वी गोराई (Gorai) येथे एका माणसाचा मृतदेह सात तुकडे केलेल्या अवस्थेत आढळून आल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. (Murder Case) हात-पाय, धड, डोकं अशा अवयवांचे तुकडे करुन सात डब्यांमधून एका गोणीमध्ये भरुन झुडुपांमध्ये ही गोणी भिरकावण्यात आली होती. याप्रकरणी गोराई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून या हत्येचे गूढ उकलले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गोराई येथील मृत व्यक्तीचे नाव रघुनंदन पासवान असून त्याचे आंतरधर्मीय प्रेमसंबंधांतून ही हत्या झाली असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीस अटक केली आहे. मृत रघुनंदन मूळचा बिहारचा रहिवासी असून पुण्यात मजुरी करतो. भाईंदरमधील एका अल्पवयीन मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. ते मुलीच्या कुटुंबाला मान्य नव्हते. त्यातूनच ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे.



दारू पाजून नशेत केली हत्या


रघुनंदन हा गेल्या आठ महिन्यांपासून पुण्याच्या एका कंपनीत काम करत होता. दिवाळीच्या सुट्टीत तो घरी गेला मात्र ३१ ऑक्टोबर रोजी तो मित्रांसोबत मुंबईला जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला. मुंबईला आल्यानंतर रघुनंदनने दारूच्या नशेत भाईंदरमध्ये राहणारा प्रेयसीचा भाऊ मोहम्मद सत्तार याला फोन केला. मोहम्मदने त्याला स्वतःकडे बोलावून दारू पाजली व नशेत त्याची हत्या केली. त्यानंतर आरोपीने मृतदेहाचे तुकडेकरुन हत्येच्या दुसऱ्या दिवशी ते तुकडे प्लास्टिकच्या डब्यात भरून तो डबा गोराईतील झुडुपात फेकून दिला.


दरम्यान, या गुन्ह्यात अटक आरोपीचा सहभाग असल्याचे तपासात समोर येत असून रिक्षाचालकाला याबाबत काही माहिती नसल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त होत आहे. (Mumbai Crime)



टॅटूमुळे पटली मृतदेहाची ओळख


मृत रघुनंदनचे वडील जितेंद्र पासवान यांनी मुलाच्या उजव्या हाताच्या टॅटूवरून त्याची ओळख पटवली. त्यावर 'आरए अशी इंग्रजी अक्षरे लिहिली होती. रघुनंदनचे ज्या मुलीशी प्रेम होते, तिचे नाव 'ए' अक्षरावरून सुरू होते. (Gorai Murder Case)

Comments
Add Comment

राज्यात ठिकठिकाणी महापौर पदासाठी रस्सीखेच

प्रमुख महापालिकांत सत्तास्थापनेचे गणित बनले गुंतागुंतीचे ठाण्यात ‘अडीच वर्षां’वरून तणाव कोल्हापूर, अकोला,

राजपत्रात नावे घोषित न झाल्याने कोकण भवनातील नगरसेवकांची नोंदणीच लांबली

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचा महापौर कोण होणार आणि कधी होणार याची चर्चा रंगली असली तरी प्रत्यक्षात अद्यापही

मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होणार.. जिथे युतीमध्ये लढलो तिथे महायुतीचा महापौर होणार -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्पष्ट

मुंबई : शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल

कांदिवली–बोरिवली सहावा ट्रॅक सुरू; महिन्याभराच्या ब्लॉकनंतर पश्चिम रेल्वेने घेतला मोकळा श्वास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सततच्या ब्लॉकमुळे हैराण झालेल्या प्रवाशांसाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे.

मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार राऊतांनी दिवास्वप्ने पाहू नयेत - भाजपचा प्रहार

मुंबई : महापालिका निवडणुकीत भाजपा-शिवसेनेच्या महायुतीच्या विकासाच्या धोरणाला तसेच मुख्यमंत्री देवेंद्र

मुंबईच्या महापौर पदाबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा

मुंबई : मुंबईच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेत आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू असताना, मुख्यमंत्री देवेंद्र