Maharashtra Election : उबाठाचा पायगुण! काल सभा घेतली, मुंबईत पोहचण्याआधी पदाधिका-यांनी केला भाजपात प्रवेश!

कणकवली : सिंधुदुर्गमध्ये काल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा (Maharashtra Election Sabha) झाली. या सभेनंतर सिंधुदुर्गमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपजिल्हाप्रमुखासह पदाधिका-यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केल्याने ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.


आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत


सिंधुदुर्ग उपजिल्हाप्रमुख रज्जब रमदुल यांनी आपल्या सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला. यावेळी रमदुल म्हणाले की, आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाच्या विरोधात नाहीत तर जे चुकीचे कार्य करत आहेत, ज्या कारवाया होत आहेत आणि जे अतिक्रमण सुरु आहे त्याविरोधात नितेश राणे आहेत. कोकणातील मुस्लिम समाजाच्या लोकांना सर्वात जास्त आधार हा राणेंनी दिला आहे. त्यामुळे मुस्लिम समाज बहुसंख्येने नितेश राणे यांच्या सोबत असल्याची प्रतिक्रिया यावेळी रज्जब रमदुल यांनी दिली.



ते पुढे म्हणाले की, मी सुरुवातीपासूनच राणे कुटुंबाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता होतो. २००८ पासून स्वाभिमान संघटनेचे कार्य मी करत होतो. या ठिकाणी गेली १४ वर्ष राणे कुटुंबाशी मी एकनिष्ठ होतो. काही गैरसमज झाल्यामुळे मी वर्षभर पक्षापासून नितेश राणेंसोबत दूर गेलो आणि शिवसेनेमध्ये प्रवेश केला. या एक वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा नितेश राणे यांनी माझ्याशी सतत संपर्क ठेवला. माझ्या सुखदुःखामध्ये साहेब नेहमी विचारपूस करायचे, ईद सणानिमित्त साहेब आशीर्वाद द्यायचे, धन्यवाद द्यायचे, फोन करून शुभेच्छा द्यायचे, माझ्यावर वैयक्तिक संकट आले असताना सुद्धा साहेबांनी धीर देण्याचा प्रयत्न केला आणि आज साहेबांची असलेली निष्ठा साहेबांवरती असलेल्या प्रेम आणि या निवडणुकीमध्ये साहेबांच्या निष्ठेमुळे प्रेमामुळेच या ठिकाणी आणि विकास कामांचा जोर साहेबांचा असल्यामुळे मी आज राणे कुटुंबामध्ये पुन्हा एकदा स्वगृही येण्याचा मी या ठिकाणी आज प्रयत्न केलेला आहे, असे ते म्हणाले.


कोकणातील मुस्लिम बांधवांना सर्वात जास्त आधार राणेसाहेबांचाच


कोकणातील मुस्लिम बांधवांना सर्वात जास्त आधार हा राणेसाहेबांनी दिलेला आहे आणि आजपर्यंत त्यांचा तो कायम आहे यामुळे राणे साहेबांची भूमिका ही पूर्ण मुस्लिम समाजाच्या विरोधात नसल्याने साहेबांना त्याची आम्हाला समजूत खात्री घातलेली आहे, त्यामुळे नक्कीच मुस्लिम समाज सुद्धा बहुसंख्येने साहेबांसोबत आज आहे, असे रमदुल यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Malegaon : मालेगावमध्ये दीड लाखाचे एमडी जप्त

मालेगाव : शहरालगतच्या द्याने रमजानपुरा पोलिसांनी अवैध अमली पदार्थाची विक्री आणि तस्करी करणाऱ्यांवर मोठी

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार

INDvsSL : भारताविरुद्धच्या कोलंबो कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंका पिछाडीवर

कोलंबो : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कोलंबो

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Healthy Drinks : चहा महागला म्हणून चिंता सोडा! सकाळी चहाऐवजी प्या 'हे' पेय; शरीर होईल डिटॉक्स अन् वजनही घटेल

साखर आणि चहाचे भाव वाढल्याने खिशावर पडणारा ताण कमी करण्यासाठी आणि आरोग्याला उत