Thackeray Vs Shinde Group : शिवसेना विरुद्ध शिवसेना! जोगेश्वरी राड्याप्रकरणी उबाठा गटाविरोधात गुन्हे दाखल

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2024) रणसंग्रामात मुंबईतील जोगेश्वरी (Jogeshwari) येथे शिवसेना विरुद्ध शिवेसेना (Thackeray vs Shinde Shivsena Group) गटात जोरदार राडा झाला. काल रात्री मातोश्री क्लबबाहेर दोन्ही गट समोरासमोर आले असता त्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी व दगडफेक झाली. या राड्याप्रकरणी आता शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर ३ वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, पैसे वाटप होत असल्याच्या आरोपामुळे दोन्ही शिवसेना गटाविरोधात हाणामारी झाली. यावेळी रात्री शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते जोगेश्वरी पूर्वेकडील मातोश्री क्लबबाहेर मोठ्या संख्येने जमा झाले होते. त्यावेळी रस्त्यावर मोठी गर्दी झाल्यामुळे नागरिकांना त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनिषा वायकरांच्या महिला कार्यकर्त्याच्या गाडीचा पाठलाग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाल्यामुळे देखील विनयभंगाचा गुन्हा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर दाखल केला आहे.



या प्रकरणामुळे उबाठा गटात तणावाचं वातावरण निर्माण झाले असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. (Thackeray vs Shinde Shivsena Group)

Comments
Add Comment

BMC Election 2026 : मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी कधी सुरू होणार ? कशी असेल प्रक्रिया ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी मतमोजणी शुक्रवार १६ जानेवारी २०२६

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत