Murder: पत्नी-तीन मुलांची हत्या करून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर टाकला फोटो, नंतर उचलले हे भयानक पाऊल

लखनऊ: उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून सामूहिक हत्याकांडाची(Murder) धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका ज्वेलरने आधी आपली पत्नी, दोन मुली आणि एका मुलाला विषारी पदार्थ देऊन हत्या केली. त्यानंतर स्वत: रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला वाचवले.


या घटनेचा खुलासा सोमवारी संध्याकाळी झाला. ज्वेलर मुकेश कुमार वर्माने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर आपली पत्नी आणि मुलांच्या मृतदेहाचे फोटो टाकले होते. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. त्याचे स्टेटस पाहिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी खोल्यांची तपासणी केली तेव्हा खरंच तेथे मृतदेह होते.


इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, मुकेश कुमारची पत्नी रेखा, मुलगी भव्या(२२), काव्या(१७) आणि मुलगा अभिष्ट(१२) यांचे मृतदेह चार मजली इमारतीच्या विविध खोल्यांमधून ताब्यात घेण्यात आले. या इमारतीत मुकेश कुमार वर्मा आपल्या भावांसह राहत होता.


मुकेश कुमारने आपल्या कौटुंबिक वादामुळे आधी आपल्या कुटुंबियांची हत्या(Murder) केली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर जात मरूधर एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मुकेशला रेल्वे लाईनवर उडी मारताना पाहून लोकांनी आरडाओरड केली. यानंतर प्लॅटफॉर्मवर उपस्थिती आरपीएफ जवानांनी त्याला वाचवले.

Comments
Add Comment

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी बातमी; १३ एप्रिलला बैठक, वेतन आणि निवृत्तीवेतनावर अंतिम निर्णय होणार

नवी दिल्ली: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसंदर्भात लवकरच एक महत्त्वाची बैठक होणार आहे. राष्ट्रीय

TRP of News Channels : वृत्तवाहिन्यांच्या टीआरपीवर केंद्राकडून पुन्हा लगाम! वृत्तवाहिन्यांवरील बंदी आणखी काही आठवड्यांसाठी वाढवली

केंद्र सरकारने टीव्ही वृत्तवाहिन्यांचे टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स (टीआरपी) आणखी चार आठवड्यांसाठी निलंबित

Anant Ambani: अनंत अंबानींनी दिली मोठी देणगी; केरळमधील दोन मंदिरांना ६ कोटी रुपये

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​कार्यकारी संचालक अनंत अंबानी यांनी केरळमधील दोन प्रमुख धार्मिक

Manipur on edge : मणिपूरमध्ये रॉकेट हल्ल्यात दोन चिमुरड्यांचा मृत्यू; संतप्त जमावाचा सुरक्षा दलांवर हल्ला, बिष्णुपूरमध्ये तणाव

इंफाळ : मणिपूरमधील वांशिक हिंसाचाराने पुन्हा एकदा भीषण रूप धारण केले आहे. बिष्णुपूर जिल्ह्यात मंगळवारी पहाटे

Amaravati Capital : 'अमरावती' आता आंध्र प्रदेशची 'कायमस्वरूपी' राजधानी; केंद्राचे गॅझेट नोटिफिकेशन जारी!

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशच्या (Andhra Pradesh) राजधानीबाबत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर केंद्र सरकारने

Rajnath Singh : "पाकिस्तानने बंगालकडे वाईट नजरेने पाहिलं तर..."; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांच्या भडकाऊ वक्तव्याला जोरदार