Murder: पत्नी-तीन मुलांची हत्या करून व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर टाकला फोटो, नंतर उचलले हे भयानक पाऊल

लखनऊ: उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातून सामूहिक हत्याकांडाची(Murder) धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका ज्वेलरने आधी आपली पत्नी, दोन मुली आणि एका मुलाला विषारी पदार्थ देऊन हत्या केली. त्यानंतर स्वत: रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला वाचवले.


या घटनेचा खुलासा सोमवारी संध्याकाळी झाला. ज्वेलर मुकेश कुमार वर्माने व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर आपली पत्नी आणि मुलांच्या मृतदेहाचे फोटो टाकले होते. त्यानंतर या घटनेचा खुलासा झाला. त्याचे स्टेटस पाहिल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी खोल्यांची तपासणी केली तेव्हा खरंच तेथे मृतदेह होते.


इटावाचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय कुमार यांनी या प्रकरणाची माहिती दिली. ते म्हणाले, मुकेश कुमारची पत्नी रेखा, मुलगी भव्या(२२), काव्या(१७) आणि मुलगा अभिष्ट(१२) यांचे मृतदेह चार मजली इमारतीच्या विविध खोल्यांमधून ताब्यात घेण्यात आले. या इमारतीत मुकेश कुमार वर्मा आपल्या भावांसह राहत होता.


मुकेश कुमारने आपल्या कौटुंबिक वादामुळे आधी आपल्या कुटुंबियांची हत्या(Murder) केली. त्यानंतर रेल्वे स्टेशनवर जात मरूधर एक्सप्रेससमोर उडी घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मुकेशला रेल्वे लाईनवर उडी मारताना पाहून लोकांनी आरडाओरड केली. यानंतर प्लॅटफॉर्मवर उपस्थिती आरपीएफ जवानांनी त्याला वाचवले.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने