Jharkhand Assembly Election : झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ६५.२७ टक्के मतदान

रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीत(Jharkhand Assembly Election) बुधवारी पहिल्या टप्प्यात एकूण ४३ जागांवर मतदान झाले. याठिकाणी संध्याकाळपर्यंत सुमारे ६५.२७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर एकूण ६८३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.


राज्याच्या शहरी भागातील मतदारांमध्ये यंदाही उदासीनता दिसून आली. रांचीमध्ये सर्वात कमी मतदान झाले, तर जमशेदपूर पूर्व, जमशेदपूर पश्चिम, हटिया, कानके हजारीबाग येथील मतदारही उदासीन राहिले. याठिकाणी ६० टक्क्यांहून कमी मतदान झाले. मात्र, यावेळी रांचीमध्ये मतदानाचा आकडा ५० टक्क्यांच्या पुढे गेला. यंदाच्या निवडणुकीत रांची येथे ५१.५० टक्के मतदान झाले.


कणके वगळता इतर शहरी भागातही मतदानाच्या टक्केवारीत अंशत: सुधारणा झाली. खरसावन येथे सर्वाधिक ७७.३२ टक्के मतदान झाले. झारखंडमध्ये पहिल्यांदाच ४३ जागांसाठी एकाच वेळी मतदान झाले. काही तुरळक घटना वगळता मतदान पूर्णपणे शांततेत पार पडले. निवडणूक आयोग आणि पोलिस प्रशासनाचे हे मोठे यश मानता येईल.


राज्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर नियोजित वेळेनुसार सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी होत्या, जिथे त्यांची वेळेवर दुरुस्ती करण्यात आली किंवा ती बदलून मतदान सुरू झाले. पहिल्या टप्प्यात ज्या ४३ जागांवर मतदान झाले. एकूण १५,३४४ मतदान केंद्रांपैकी ९५० मतदान केंद्रांवर दुपारी ४ वाजेपर्यंत आणि उर्वरित सर्व मतदान केंद्रांवर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले.


नियोजित वेळेत रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांना मतदानाची संधी देण्यात आली. कोडरमा, बरकाथा, बार्ही, हजारीबाग, जमशेदपूर पूर्व, जमशेदपूर पश्चिम, माझगाव, रांची, हटिया, पंकी आणि भवनाथपूर येथील १०० टक्के मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले.

Comments
Add Comment

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे

Madhya Pradesh : कफ सिरप नाही, विष! औषधामुळे ११ चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू; मध्य प्रदेश-राजस्थान हादरले, दोन्ही सिरपवर तात्काळ बंदी

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील सरकारी आरोग्य केंद्रांमधून वाटण्यात येत असलेल्या एका कफ सिरपमुळे (Cough

आता देशभरात 'ई-सिम'

सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएलने (भारत संचार निगम लिमिटेड) टाटा कम्युनिकेशन्ससोबत हातमिळवणी केली आहे. या