Jharkhand Assembly Election : झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात ६५.२७ टक्के मतदान

रांची: झारखंड विधानसभा निवडणुकीत(Jharkhand Assembly Election) बुधवारी पहिल्या टप्प्यात एकूण ४३ जागांवर मतदान झाले. याठिकाणी संध्याकाळपर्यंत सुमारे ६५.२७ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर एकूण ६८३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले.


राज्याच्या शहरी भागातील मतदारांमध्ये यंदाही उदासीनता दिसून आली. रांचीमध्ये सर्वात कमी मतदान झाले, तर जमशेदपूर पूर्व, जमशेदपूर पश्चिम, हटिया, कानके हजारीबाग येथील मतदारही उदासीन राहिले. याठिकाणी ६० टक्क्यांहून कमी मतदान झाले. मात्र, यावेळी रांचीमध्ये मतदानाचा आकडा ५० टक्क्यांच्या पुढे गेला. यंदाच्या निवडणुकीत रांची येथे ५१.५० टक्के मतदान झाले.


कणके वगळता इतर शहरी भागातही मतदानाच्या टक्केवारीत अंशत: सुधारणा झाली. खरसावन येथे सर्वाधिक ७७.३२ टक्के मतदान झाले. झारखंडमध्ये पहिल्यांदाच ४३ जागांसाठी एकाच वेळी मतदान झाले. काही तुरळक घटना वगळता मतदान पूर्णपणे शांततेत पार पडले. निवडणूक आयोग आणि पोलिस प्रशासनाचे हे मोठे यश मानता येईल.


राज्यातील बहुतांश मतदान केंद्रांवर नियोजित वेळेनुसार सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही केंद्रांवर ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटीमध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी होत्या, जिथे त्यांची वेळेवर दुरुस्ती करण्यात आली किंवा ती बदलून मतदान सुरू झाले. पहिल्या टप्प्यात ज्या ४३ जागांवर मतदान झाले. एकूण १५,३४४ मतदान केंद्रांपैकी ९५० मतदान केंद्रांवर दुपारी ४ वाजेपर्यंत आणि उर्वरित सर्व मतदान केंद्रांवर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले.


नियोजित वेळेत रांगेत उभ्या असलेल्या सर्व मतदारांना मतदानाची संधी देण्यात आली. कोडरमा, बरकाथा, बार्ही, हजारीबाग, जमशेदपूर पूर्व, जमशेदपूर पश्चिम, माझगाव, रांची, हटिया, पंकी आणि भवनाथपूर येथील १०० टक्के मतदान केंद्रांवर सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.