काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलेल्यांकडून काय अपेक्षा ठेवणार! काश्मिरमधून दहशतवाद संपविण्याचे काम मोदींनी केले

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी केले उद्धव ठाकरेंना लक्ष्य


मुंबई : काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाने प्रस्ताव ठेवला की कलम ३७० पुन्हा लागू केले पाहिजे. सगळ्यात आधी मला उद्धव ठाकरे यांना विचारायचे आहे. उद्धवजी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सांगा की कलम ३७० पुन्हा आणायचे आहे की नाही. जाऊ द्या, उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. त्यांच्या उत्तराची अपेक्षा ठेवू नका. पण मी सांगून जातो, राहुल गांधी तुमची चौथी पिढी जरी आली तरी कलम ३७० पुन्हा लागू होणार नाही. भाजपासाठी जम्मू काश्मीर हा आमच्या सत्तेपेक्षाही प्रिय मुद्दा आहे. काश्मीर मधून दहशतवाद संपवण्याचे काम आमच्या पंतप्रधान मोदींनी (PM Modi) केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी (Amit Shah) केले.


विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईत आले आहेत. राज्यभरात अमित शहा यांनी सभांचा धडाका लावला असून त्यांनी मंगळवारी अनेक भागांचा दौरा केला. मुंबईत संध्याकाळी घाटकोपर येथे झालेल्या प्रचारसभेत अमित शाह यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. कलम ३७० हटवण्यावरूनही अमित शाह यांना उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.



संसदेत जेव्हा मी कलम ३७० हटवण्यासाठी विधेयक घेऊन उभा होतो, तेव्हा राहुल गांधी शरद पवारांचा पक्ष ममता बॅनर्जींचा पक्ष आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ओरडत होते. ते म्हणाले की ३७० हटवू नका. मी का असे विचारले. त्यावर ते म्हणाले की जर ३७० हटवले तर देशात रक्ताच्या नद्या वाहतील. राहुल गांधींनी लक्षात ठेवावे, कलम ३७० हटवून सहा वर्षे झाली रक्ताच्या नद्या सोडा कोणाची दगड फेकण्याची हिंमत नाही. पंतप्रधान मोदींनी देशाला आतंकवाद दहशतवाद आणि नक्षलवादापासून मुक्त केले आहे, असे अमित शहा म्हणाले.

Comments
Add Comment

मुंबईतील १३ प्रभागांमध्ये समान आरक्षणाची हॅट्रीक, सलग तिसऱ्या निवडणुकीतही आरक्षण राहिले सारखेच

मुंबई (सचिन धानजी): मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५करता प्रभाग आरक्षण सोडत जाहीर झाली. या प्रभाग

महापालिकेचे वादग्रस्त कचरा खासगीकरणाचे कंत्राटाची निविदा अंतिम, कंपन्यांनी सुमारे ३२ ते ३४ टक्के अधिक दराने लावली बोली

मुंबई (खास प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या सफाई खात्याच्यावतीने कचरा उचलण्यासाठी वाहनांसह मनुष्यबळ

अतिक्रमण तोडलेल्या गोरेगाव मुलुंड जोड रस्त्यांचा भाग अडथळामुक्त, या रस्त्यावरुन प्रवास करता येणार सुरळीत

मुंबई (खास प्रतिनिधी): उत्तर मुंबईमध्ये पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडणारा गोरेगाव- मुलंड लिंक रोड विकसित

मुंबई महापालिकेच्या मालमत्ता कराची शासनाकडे सव्वा तीन हजार कोटींची थकबाकी, महापालिकेच्या पाठपुराव्याला अपयश

मुंबई ( खास प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या वतीने तब्बल २ लाख ३२ हजार कोटींची विकास कामे हाती घेण्यात आली. ही

फडणवीसांचा मोठा निर्णय! मंत्रिमंडळ बैठकीच्या दिवशीच ५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : मागील काही महिन्यांपासून मोठ्या संख्येने राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. गेल्याच

मुंबई महापालिका विक्रोळी पार्कसाईट येथील २८ इमारतींचा पुनर्विकास करणार

मुंबई (खास प्रतिनिधी) : विक्रोळी पार्कसाईट येथे असलेल्या महानगरपालिकेच्या २८ इमारतींचा पुनर्विकास