Mumbai University: मुंबई विद्यापीठाची आशिया रँकिंगमध्ये दमदार झेप!

मुंबई: मुंबई विद्यापीठाने क्यूएस आशिया युनिव्हर्सिटी रँकिंग २०२५ मध्ये उल्लेखनीय प्रगती साधत ६७ वरून थेट ५२ क्रमांकावर झेप घेतली आहे. जागतिक क्रमवारीतही विद्यापीठाने २९१-३०० रँकिंग बँडमधून २४५ व्या स्थानी पोहोचत गुणवत्ता सुधारली आहे. या यशामुळे मुंबई विद्यापीठ आशियातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये आपले महत्त्वपूर्ण स्थान बजावू लागले आहे.

क्वाकरेली सायमंड्स (QS) च्या अहवालानुसार, मुंबई विद्यापीठाने धोरणात्मक सुधारणांना प्राधान्य देत, संस्थात्मक प्रतिष्ठा, रिसर्च आऊटपूट, वैश्विक सहभागिता यासह इतर निकषांमध्ये विशेष कामगिरी केली आहे. विद्यापीठाने यंदा १९ वरून ३४ एकूण गुण मिळवत आपला दर्जा अधिक भक्कम केला आहे.




मुंबई विद्यापीठाने पेपर्स पर फॅकल्टी या निकषात ९०.६ गुण मिळवत सर्वाधिक प्रगती साधली आहे. त्यानंतर नियोक्ता प्रतिष्ठा ६४.१, शैक्षणिक प्रतिष्ठा ३४.६, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी गुणोत्तर ३२.६, आंतरराष्ट्रीय संशोधन नेटवर्क २१.३ आणि इतर महत्त्वाच्या निकषांमध्ये उल्लेखनीय कामगिरी दर्शवली आहे. तसेच, विद्यापीठाने इनबाऊंड आणि आऊटबाऊंड एक्सचेंज स्टुडेंट कॅटेगरीमधील आपले मागील स्तर टिकवले आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या सर्व घटकांनी संशोधन व विकासाच्या दिशेने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे. भविष्यात सायटेशन पर पेपर आणि स्टुडेंट एक्सचेंज प्रोग्राममध्ये आणखी सुधारणा करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

Cyprus and India : सायप्रस आणि भारत यांच्यातील सांस्कृतिक संबंध दृढ

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस 'इश्का' बॉलिवूड चित्रपटाचा थाटात मुहूर्त मुंबई :

Bandra Encroachment Removal Campaign : वांद्रे स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव मोहीम; अनधिकृत मशिदीवर महापालिकेची कारवाई

मुंबई : मुंबईतील वांद्रे स्थानकाबाहेरील परिसरात आज सकाळी मोठी अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. या

IPL 2026 : आरसीबीसाठी दिलासादायक बातमी! विराट कोहलीचा ओपनिंग पार्टनर प्लेऑफपूर्वी संघात परतणार...

RCB : आयपीएल २०२६ मध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघातून बाहेर झाले आहेत. त्यामुळे संघांना त्याचा मोठा फटका बसला

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत तेजस नेटवर्क्स आणि महाआयटीमध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना दूरसंचार तंत्रज्ञानाचे जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार मुंबई :

Virat Kohli : ९ वर्षांत कुणी विचारलंच नाही – तू कसा आहेस ? कसोटी कर्णधारपद सोडण्यावरून विराट कोहलीचा भावनिक खुलासा ..

बेंगळुरू : विराटने कसोटी कर्णधारपद सोडून आज ४ वर्षे उलटून गेली आहेत तरीही त्याच्या त्या निर्णयावर अजूनही बऱ्याच